मोबाइल फोन बनवणाऱ्या कंपन्या यूरोपियन यूनियनच्या अनेक देशात इमरजन्सी अलर्ट फीचर देत आहेत. काही मोबाइल कंपन्या भारतात इमरजन्सी अलर्ट फीचर देतात. परंतु आता या फीचरला ऑन कराल तर मेसेज येईल की, सध्या हे फीचर भारतीय यूजर्ससाठी उपलब्ध नाही. परंतु, आता सरकारने या फीचरला बंधनकारक करण्यात आले आहे. मोबाइल बनवणाऱ्या कंपन्यांना सर्व स्मार्टफोन मध्ये इमरजन्सी अलर्ट फीचर द्यावे लागतील. सोबत जुन्या स्मार्टफोनसाठी सॉफ्टवेयर अपडेट करावे लागेल. असे न केल्यास मोबाइल कंपन्या आपल्या स्मार्टफोनला भारतात विकू शकणार नाही. सरकारने मोबाइल कंपन्यांना ६ महिन्याची वेळ दिली आहे.
वाचाःफास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?
हे फोन खरेदी करू नका
- जर यूजर्सचा विचार केल्यास, यूजर्सला स्वस्तात विना इमरजन्सी अलर्ट फीचरचा स्मार्टफोन खरेदी करणे टाळावे, अन्यथा तुम्हाला ६ महिन्यानंतर पश्चाताप करण्याची वेळ येईल.
- भारत सारख्या देशात भूकंप येणे सामान्य बाब आहे. त्यामुळे स्मार्टफोन मध्ये इमरजन्सी अलर्ट फीचर असणे आवश्यक आहे.
- जर कोणतेही विना इमरजन्सी अलर्ट फीचर फोन स्वस्तात विक्री करीत असेल तर त्यापासून दूर राहायला हवे.
वाचाःSamsung Galaxy S23 : सॅमसंग गॅलेक्सी S23 फोनवर बंपर डिस्काउंट, तब्बल ३७ हजार वाचवू शकतावाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा