सोम प्रदोष व्रत मुहूर्त
त्रयोदशी तिथीची सुरुवात – ३ एप्रिल सकाळी ६ वाजून २५ मिनिटे.
त्रयोदशी तिथीची समाप्ती – ४ एप्रिल सकाळी ८ वाजून ६ मिनिटे.
प्रदोष व्रत पूजा मुहूर्त – संध्याकाळी ५ वाजून ५५ मिनिटे ते ७ वाजून ३० मिनिटापर्यंत.
प्रदोष व्रत किंवा त्रयोदशी तिथीच्या पूजेचा मुहूर्त सूर्यास्ताच्या ४५ मिनिटे आधी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर ४५ मिनिटे असा असतो. या कालखंडाला प्रदोष काळ म्हणतात.
पूजा विधी
प्रदोष काळात मनोभावे पूजा करावी. या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान वगैरे करून हातात तांदूळ घेऊन व्रताचा संकल्प घ्यावा. सकाळीही भगवान शंकराची विधिवत पूजा करावी. दिवसभर उपवास ठेवा आणि रुद्राक्ष जपमाळेने महामृत्युंजय मंत्राचा जप करा. यानंतर प्रदोष काळात शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक करावा. त्यानंतर शिवलिंगावर २१ बेलपत्रे अर्पण करून फुले, पांढरी मिठाई, चंदन इत्यादी वस्तू अर्पण करा. यानंतर तुपाच्या दिव्याने आरती करून शिव चालिसाचे पठण करावे.
प्रदोष व्रत कथा
पौराणिक कथेनुसार एका गावात एक ब्राह्मणी राहत होती. तिच्या पतींचं निधन झालं होतं. तिला पोटापाण्यासाठी मुलासमवेत भीक मागण्यासाठी बाहेर जावं लागायचं. ती स्वत: आणि आपल्या मुलाला भीक मागून खाऊ घालायची. एक दिवस ब्राह्मणी घरी परतत असतांना तिला एक मुलगा जखमी अवस्थेत विव्हळत असल्याचे आढळले. ब्राह्मणीने त्याला तिच्या घरी आणले. मुलगा विदर्भाचा राजपुत्र होता. शत्रूच्या सैन्याने त्याच्या राज्यावर हल्ला चढवला होता आणि त्याच्या वडिलांना पकडून आणले होते आणि राज्याचा ताबा घेतला होता, म्हणून तो इकडे-तिकडे फिरत होता. राजकुमार ब्राह्मणांच्या घरात ब्राह्मण-पुत्राबरोबर राहू लागला. मग एक दिवस अंशुमति नावाच्या गंधर्व मुलीने राजकुमारला पाहिले आणि ती त्याला मोहित झाली. दुसर्या दिवशी अंशुमति तिच्या आईवडिलांना राजकुमाराला भेटायला घेऊन आली. त्यांना देखील राजपुत्र आवडला. काही दिवसांनंतर भगवान शंकरांनी अंशुमतीच्या आई-वडिलांना स्वप्नात आज्ञा केली की राजकुमार आणि अंशुमतीचे लग्न करावे. त्यांनीही तेच केले. ब्राह्मणी प्रदोष व्रत करत असे. आपल्या मनोभावे उपवासाचा परिणामामुळे आणि गंधर्वराजांच्या सैन्याच्या मदतीने राजकुमाराने विदर्भातून शत्रू पळवून लावले आणि आपल्या वडिलांचे राज्य परत मिळवले. राजकुमारने ब्राह्मण-मुलाला आपल्या राज्याचे प्रधान बनवीले. ज्याप्रमाणे ब्राह्मणीच्या प्रदोष व्रताच्या महानतेमुळे राजकुमार आणि ब्राह्मण मुलाला चांगले दिवस आले, त्याचप्रमाणे भगवान शंकर त्यांच्या इतर भक्तांवर कृपा करतात. म्हणूनच, सोम प्रदोष यांचे उपवास ठेवणार्या सर्व भक्तांनी ही कथा वाचली किंवा ऐकली पाहिजे.