Apara Ekadashi 2023 Date And Muhurta In Marathi: प्रत्येक मराठी महिन्यात दोन एकादशी येतात. प्रत्येक एकादशीचे नाव आणि तिचे महत्त्व वेगवेगळे आहे. श्रीविष्णूंच्या पूजनाने, भजनाने आणि उपासनेने जीवनातील विघ्न दूर होतात. सुख, शांतता, समृद्धी येते, असेही सांगितले जाते. अपरा एकादशीचे महत्त्व काय आहे, अपरा एकादशी कधी आहे, पूजनासाठी योग्य मुहूर्त कोणता, अपरा एकादशी पूजा विधी सर्वकाही जाणून घेऊया…
अपरा एकादशी मुहूर्त
अपरा एकादशी १५ मे पहाटे २ वाजून ४६ मिनिटांनी प्रारंभ होईल आणि दुसऱ्या दिवशी १६ मे रोजी रात्री १ वाजून ३ मिनिटांनी समाप्त होईल. यामुळे उदया तिथीच्या मान्यतेनुसार अपरा एकादशीचे व्रत १५ मेला केले जाईल.
अपरा एकादशीला भगवान विष्णूच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी ८ वाजून ५४ मिनिटे ते सकाळी १० वाजून ३६ मिनिटापर्यंत राहील.
अपरा एकादशी व्रताचे पूजन
अपरा एकदशीचे व्रत आचरणाऱ्यांनी पहाटे नियमित जीवनकर्म आटपल्यानंतर श्रीविष्णूंच्या पूजनाचा संकल्प करावा. श्रीविष्णूंचे आवाहन करून त्यांची स्थापना करावी. श्रीविष्णूंना पंचामृताचा नैवेद्य दाखवावा. अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर गंध, अक्षता, तुळशीची पाने, ऋतुकालोद्भव फुले, फळे अर्पण करावीत. यानंतर धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्रीविष्णूंची आरती करावी. मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. यथाशक्ती दान करावे.
चोरी झाल्याची स्वप्न पडतायत? खऱ्या आयुष्यावर असा होतो परिणाम
अपरा एकादशीचे महत्व
अपरा एकादशीचे व्रत अत्यंत पुण्यकारक मानले जाते. असे मानले जाते की, हे व्रत केल्यास त्याचे फळ मृत्यूनंतर मिळते. हे व्रत पाळणाऱ्याला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो आणि त्याला स्वर्गात स्थान मिळते. या व्रताचा महिमा भगवान श्रीकृष्णानेच धर्मराज युधिष्ठिराला सांगितला. हे व्रत करणाऱ्याला अपार धन मिळते आणि कीर्ती वाढते.
कथा अशी की,
महिध्वज नावाचा एक राजा होता. राजाचा धाकटा भाऊ वज्रध्वज त्याचा खूप हेवा करत असे. एके दिवशी त्याने राजाची हत्या केली आणि त्याचा मृतदेह घेऊन जंगलात पिंपळाच्या झाडाखाली पुरला. अकाली मृत्यूमुळे राजाचा आत्मा पिंपळाच्या झाडावर राहू लागला. तिथून जो कोणी जायचा त्याला राजाचा आत्मा खूप त्रास द्यायचा. एके दिवशी एक ऋषी तिथून जात होता, राजाचा आत्मा त्या ऋषीला कुठलीही इजा करू शकला नाही. ऋषींनी पिंपळाच्या झाडावरून राजाच्या अतृप्त आत्म्याला बोलावले आणि अतृप्त असल्याचे कारण विचारले. कारण समजल्यानंतर राजाला दुरात्म्यांपासून मुक्त करण्यासाठी ऋषींनी स्वतः अपरा एकादशीचे व्रत आचरले आणि द्वादशीच्या दिवशी व्रत पूर्ण झाल्यावर आपल्या व्रताचे सर्व पुण्य राजाच्या आत्म्याला दिले. एकादशी व्रताचे पुण्य प्राप्त करून राजाला मुक्ती मिळाली आणि स्वर्गप्राप्ती झाली.
नाथद्वाराला नरेंद्र मोदींनी श्रीनाथजींचे घेतले दर्शन, अशी आहे या मंदिराची मान्यता