Honor कंपनीवर होता हेरगिरीचा आरोप, पण ३ वर्षांनी कंपनी करणार भारतात पुनरागमन

नवी दिल्ली: Huawei कंपनीचा उपब्रँड असणारा Honor ब्रँड जवळपास तीन वर्षांनंतर भारतात फोन लाँच करत आहे. ऑनर ब्रँडला स्वस्त आणि कमी बजेटमध्ये प्रीमियम फीचर्स पुरवल्यामुळे भारतात लोकप्रियता मिळाली. पण त्यानंतर हेरगिरीचा आरोप लागमुळे Huawei ला भारतात व्यवसाय बंद करावा लागला. पण आता जवळपास तीन वर्षांनी Honor भारतात पुनरागमन करणार असून ऑगस्टमध्ये नवीन स्मार्टफोन लाँच करण्यासाठी ब्रँड तयार आहे.

चीनी ब्रँड Honor भारतात पुनरागमन करत आहे. कंपनी सुमारे ३ वर्षांनी भारतात परतणार आहे. या ब्रँडची सुरुवात २०१३ साली झाली होती. ज्याने २०१४ मध्ये भारतात एंट्री घेतली होती. या ब्रँडला भारतात खूप लोकप्रियता मिळाली. याचे कारण म्हणजे ऑनर ब्रँड परवडणारा आणि कमी बजेटमध्ये प्रीमियम फीचर्स प्रदान करणे.

फोन विक्री नेमकी का थांबली?
Honor ब्रँडने २०२० मध्ये भारतातून आपला व्यवसाय गुंडाळला. याचे कारण असे की हुवेई ब्रँडवर अमेरिकन सरकारने बंदी घातली होती. यामुळे अमेरिका आणि कॅनडासह युरोपियन युनियनमधील व्यवसायात हुआवेईला मोठा फटका बसला आहे. तसेच, कंपनी कायदेशीर भांडणात देखील अडकली होती. अशा परिस्थितीत कंपनीला भारतातून देखील आपला व्यवसाय गुंडाळावा लागला. Huawei कंपनीवर अमेरिकेत हेरगिरीचा आरोप होता.

कोणता स्मार्टफोन लाँच होणार?

गेल्या काही वर्षांत Honor ब्रँडने भारतात अनेक उत्तम स्मार्टफोन लाँच केले आहेत. यामध्ये Honor 9X Pro, Honor 9A आणि Honor 9S हे ब्रँड आहेत.
पण नंतर अमेरिकेच्या निर्बंधांमुळे Huawei ला अनेक बाजारपेठांमध्ये आपला व्यवसाय गुंडाळावा लागला. जरी Huawei चीन आणि निवडक जागतिक बाजारपेठेत सक्रिय होती. Honor ब्रँड पूर्णपणे भारतातून बंद झालेला नाही. कंपनीने गेल्या वर्षी भारतात फिटनेस ट्रॅकर लाँच केला होता. नुकत्याच आलेल्या रिपोर्ट्सनुसार, कंपनी आपला स्मार्टफोन भारतात पुन्हा लाँच करण्याच्या तयारीत आहे. रिपोर्टनुसार, Honor ब्रँडचा नवीन स्मार्टफोन ऑगस्टमध्ये भारतात लाँच केला जाऊ शकतो.

वाचा: UPI ने पेमेंट करताना सारखं फेल होतंय? ‘या’ सोप्या स्टेप्स करा फॉलो

Source link

honor comeback in indiahonor smartphones launchhonor upcoming smartphonesऑनर स्मार्टफोन भारतात पुन्हा लाँचऑनरचे लेटेस्ट स्मार्टफोन
Comments (0)
Add Comment