कात्यायनी देवीला प्रिय आहे हे पान; ‘या’ गोष्टी केल्याने देवी होईल प्रसन्न, आर्थिक चणचण होईल दूर

शारदीय नवरात्रीमध्ये आज षष्ठी तिथी असून, दुर्गेचे सहावे रूप देवी कात्यायनीची पूजा केली जाणार आहे. विड्याचे पान कात्यायनी मातेला अत्यंत प्रिय असल्याचे मानले जाते. असे मानले जाते की, नवरात्रीच्या दिवशी विड्याच्या पानांचे काही उपाय केल्याने माता कात्यायनी तुमची सर्व संकटे दूर करून तुमची आर्थिक चणचण दूर करून टाकते. विड्याच्या पानांचे उपाय केल्यास तुम्हाला आर्थिक समृद्धी मिळते. अविवाहित मुलींनी नवरात्रीमध्ये या पानाचे उपाय केल्यास त्यांना इच्छित जोडीदार मिळतो, असेही सांगितले जाते. चला जाणून घेऊया विड्याच्या पानाचे असेच काही खास उपाय.

आर्थिक संकटावर मात करण्यासाठी विड्याच्या पानांचे उपाय

नवरात्रीतील षष्ठीच्या दिवशी ५ विड्याची पाने घ्या आणि स्वच्छ पाण्याने धुवा. त्यानंतर, सर्व पानांवर दुर्गेचा बीज मंत्र लिहा – ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे आणि माँ दुर्गेच्या चरणी अर्पण करा. दुसऱ्या दिवशी ही पाने लाल कपड्यात बांधून आपल्या तिजोरीत किंवा पैसे जिथे ठेवता तिथे ठेवा. त्यानंतर पुढील नवरात्रात पाण्यात विसर्जित करा.

घरामध्ये आर्थिक कृपेसाठी उपाय

नवरात्रीच्या सहाव्या दिवशी धनप्राप्तीसाठी विड्याच्या पानांचा हा उपाय करा. सुपारीच्या पानांवर गुलाबाच्या पाकळ्या ठेवा आणि दुर्गा मातेला अर्पण करा. असे केल्याने तुमच्या घरात पैशाचा ओघ वाढतो आणि त्याच बरोबर तुम्ही पैसे वाचवू शकता आणि तुमची समृद्धी वाढते.

लवकर लग्नासाठी विड्याच्या पानाचा उपाय

जर तुमच्या घरात विवाहयोग्य मुलगी असेल आणि तिच्या लग्नात वारंवार अडथळे येत असतील तर आई कात्यायनीची पूजा करून विड्याच्या पानाचा हा उपाय करून पाहा. नवरात्रीच्या सहाव्या दिवशी ११ पाने घेऊन त्यावर हळद लावावी आणि कात्यायनी देवीला एक एक करून अर्पण करावी. पाने अर्पण करताना, दुर्गेच्या बीज मंत्राचा जप करत रहा, ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे. असे केल्याने लवकर विवाह होण्याची शक्यता असते.

घरातील भांडणे संपवण्यासाठी उपाय

पती-पत्नीमध्ये अनेकदा कलह आणि भांडण होत असेल तर नवरात्रीच्या सहाव्या दिवशी विड्याच्या पानावर कुंकू लावून ते दुर्गा मातेला अर्पण करावे. नंतर प्रसाद म्हणून कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये वाटून घ्या. असे केल्याने परस्पर प्रेम व स्नेह वाढेल.

शनिवारी हा उपाय करा

नवरात्रीच्या शेवटच्या शनिवारी ५ विड्याच्या पानांवर शेंदूराने जय श्री राम लिहा आणि ही पाने हनुमानाच्या मंदिरात अर्पण करा. असे केल्याने तुमच्या नोकरी-व्यवसायात येणारी प्रत्येक समस्या दूर होऊन तुमची प्रगती होते.

Source link

Navratri Sixth Day Remedy In Marathishardiya navratri 2023sixth day katyayani devi puja vidhividyachya panacha upayविड्याच्या पानाचे उपायशारदीय नवरात्री २०२३
Comments (0)
Add Comment