स्वामी विवेकानंद हे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात त्यांच्या आदर्श आणि विचारांसाठी ओळखले जातात. अगदी लहान वयातच त्यांनी आपल्या विचारांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांचे विचार तरुणांना प्रेरणा देण्याचे काम करतात . त्यामुळे हा दिवस ‘युवा दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. तरुण हा देशाचा महत्त्वाचा भाग आहे, जो देशाला पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो.
असा सुरू झाला युवा दिन :
संयुक्त राष्ट्रसंघाने १९८४ हे ‘आंतरराष्ट्रीय युवा वर्ष’ म्हणून घोषित केले. त्यानंतर भारत सरकारने यावर विचार केला आणि १२ जानेवारी हा स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. १२ जानेवारी १९८५ रोजी प्रथमच राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला.
काय आहे यंदाच्या ‘राष्ट्रीय युवा दिना’ची थीम :
यंदाच्या राष्ट्रीय युवा दिनाची थीम ‘इट्स ऑल इन द माइंड (It’s All In The Mind)’, म्हणजे सर्वकाही तुमच्या मनात आहे. सोप्या शब्दात, जर तुम्ही एखादी गोष्ट करण्याचे ठरवले असेल तर ते पूर्ण करण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही, असा या ओळीचा अर्थ आहे.
‘राष्ट्रीय युवा दिन’ साजरा करण्या मागचा उद्देश :
कोणत्याही देशाचे भविष्य तेथील तरुणांवर अवलंबून असते आणि भारतात तरुणांची संख्या जास्त आहे. देशातील तरुणांना योग्य मार्ग दाखविण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो आणि विवेकानंदजींच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश तरुणांना त्यांच्या विचारांनी प्रेरित करणे हा आहे.
असा सजरा केला जातो ‘Youth Day’ :
या दिवशी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. मुलांना स्वामी विवेकानंद आणि त्यांचे अनमोल विचार सांगितले जातात.