नागपुरात महिलेची हत्या करुन मृतदेह नदीत फेकला, तपासात धक्कादायक कारण समोर, दोघांना अटक

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : उधारी दिलेल्या पैशाच्या वादातून शीतल उईके (वय ४२, रा. बाराखोली) यांची हत्या करून मृतदेह नदीत फेकण्यात आल्याची खळबळजनक घटना जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून दोन मारेकऱ्यांना अटक केली.

काय घडलं?

सुनील उसरबरसे (वय २१, रा. बांदा) व त्याचा मित्र आर्यन महतो (वय २३, रा. प्रयागराज) अशी अटकेतील मारेकऱ्यांची नावे आहेत. याप्रकरणात पोलिसांनी एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनील व आर्यन एका दुकानात सफाईचे काम करतात. शीतलही तेथेच काम करीत असल्याने दोघांना ओळखायच्या. शीतल यांनी सुनील याच्याकडून ६५ हजार रुपये उधार घेतले. त्या त्याला पैसे देण्यास टाळाटाळ करायला लागल्या. २८ डिसेंबरला सुनीलने शीतल यांना घरी बोलाविले. चाकूने वार करून दोघांनी शीतल यांची हत्या केली. नंतर मृतदेह पोत्यात गुंडाळून तो पारशिवनीतील कन्हान नदीत फेकला. दरम्यान, शीतल बेपत्ता झाल्याने नातेवाइकांनी त्यांचा शोध घेतला. आढळून न आल्याने नातेवाइकाने जरीपटका पोलिसांत तक्रार केली. चौकशीदरम्यान सुनीलचे नाव समोर आले. पोलिसांनी सुनील व त्यानंतर आर्यनला ताब्यात घेतले. दोघांनी अल्पवयीन मुलाच्या मदतीने हत्या करून मृतदेह नदीत फेकल्याचे सांगितले. पोलिसांनी दोघांना अटक केली. बुधवारी शीतल यांचा मृतदेह पोलिसांना आढळला.
विवाहितेचे माहेरच्या मंडळींकडूनच अपहरण; वडील, काकासह तिघांचा प्लॅन, काय कारण?

Source link

barakholi nagpurJaripatka Police Stationnagpur crime newsNagpur newswoman died
Comments (0)
Add Comment