पुणे,दि.११ :- पुण्यामध्ये जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर करण्यात आलेल्या हल्ल्याचा पुण्याच्या कसबा आमदार रवींद्र धंगेकर यांनी हल्लेखोरांवर कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.
Thank you for reading this post, don’t forget to subscribe!
‘निर्भय बनो’ सभेला प्रमुख वक्ते म्हणून आलेल्या जेष्ठ पत्रकार निखिल वागळे, विश्वंभर चौधरी, ॲड. असिम सरोदे यांच्या गाडीवर हल्ला करत त्यांना जिवे मारण्याचा प्रकार भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला. या हल्लाचा आमदार रवींद्र धंगेकर यांनी तीव्र शब्दात निषेध केला. व पत्रकारांनशी बोलताना रवींद्र धंगेकर म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज,फुले, शाहू, आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात भाजपचे कार्यकर्ते विचारवंतांवर हल्ले करत आहे. दडपशाही माजवत आहेत. त्यांच्या वाहनांवर दगडफेक करून जिवे मारण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे महाराष्ट्र कधीच खपवून घेणार नाही. हल्लेखोरांवर पोलिसांनी भारतीय दंड संहितेतील कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करावा,” अशी मागणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली.
तसेच पुढे आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, “ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, विश्वंभर चौधरी, ॲड. असिम सरोदे यांच्यासह त्यांच्या संरक्षणासाठी पुढे आलेले महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला केला. हा हल्ला जीवघेणा होता. लोकशाहीत प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे.