पुणे,दि.२६ :- पुण्यातील पाषाण परिसरातील सोमेश्वर वाडी परीसरातील संध्यानगर येथील भागांतील आज दि.१ रोजी सकाळी ७ वाजल्यापासून नळांच्या पाण्यातून थेट गटारीचे पाणी येत असल्याने संध्या नगर येथील महिला त्रस्त झाले आहे. पिण्यासाठी व आंघोळीसाठी इतर वापरासाठी नळाच्या पाणी भरावे लागते पाणीपुरवठा विभागाने या भागातील पाण्याचे नमुने गोळा केले असले तरी ऐन उन्हाळ्या सुरू होण्यापूर्वी पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
Thank you for reading this post, don’t forget to subscribe!
गेल्या काही दिवसांपासून जुनी डिरनीस लाईन आहे व तुंबल्याने डिरनीस सांड पाणी लिकेज होऊन पाणी जमिनीत जिरपत होते परंतु काही दिवसापूर्वी डेंजर लाईन नवीन टाकूनही आज दि.१ रोजी चक्क पुणे मनपाच्या नारळालाच पिण्याच्या पाण्यातुन या भागातील अनेक घरांतील नळांना येणाऱ्या पाण्याला गटारीच्या वास व पाण्याचा उग्र वास येत आहे. त्यामुळे अनेक महिलां कष्टकरी, मध्यमवर्गीय अशा संमिश्र वस्तीचा भागातील नागरिक त्रस्त झाले आहे. या ठिकाणी गत गढूळ पाण्याचा पुरवठा सुरू आहे. आज दि.१ गुरुवार २०२४ पासून चक्क पुणे मनपाच्या पाण्याला गटारीचे पाणी नळाला येत असल्याने नागरिक व महिला त्रस्त आहेत. या पाण्याला गटारीच्या पाण्यासारखा उग्र दर्प येत आहे.