भाजप देशात असहिष्णुता पसरवतोय,ज्यामुळे देशातील लाखो लोकांचे…; राहुल गांधींची गंभीर टीका

कन्नूर (केरळ): ‘भारतीय जनता पक्ष हा देशात असहिष्णुता निर्माण करून, देशातील लाखो लोकांचे नुकसान करत आहे,’ असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी केला. देशाची विविधता बदलण्याचा भाजप प्रयत्न करत आहे, तर काँग्रेस विविधतेचा स्वीकार करीत आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.

कन्नूरमध्ये एका भव्य निवडणूक रॅलीला संबोधित करताना त्यांनी वरील आरोप केला. ते म्हणाले की, लोकसभेची निवडणूक ही कदाचित देशाच्या आधुनिक इतिहासातील पहिलीच अशी निवडणूक असेल, जी देशाची राज्यघटना आणि आपल्या लोकशाही संरचनेशी संबंधित असेल.

राहुल म्हणाले, ‘भाजप आज देशात जे करण्याचा प्रयत्न करत आहे, तो कोणत्याही राजकीय पक्षाने केलेला नाही. संविधान हा आधुनिक भारताचा पाया आहे. ते देशातील नागरिकांना समान हक्क आणि समान संधी देते. आपल्या संविधानाचे संरक्षण देशातील विविध संस्थांनी केले आहे.’
कोण आहेत पल्लवी डेम्पो? १ हजार ४०० कोटींची संपत्ती, दुबई-लंडनमध्ये अपार्टमेंट; या मतदारसंघातून भरला अर्ज

ते म्हणाले की, नोकरशाही, न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग, पोलिस, केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय), सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि इतर एजन्सी संविधानाचे आणि भारतीय नागरिकांच्या हक्कांचे रक्षक आहेत. या संस्थांवर कब्जा करून; तसेच ईडी आणि सीबीआयचा राजकीय शस्त्रे म्हणून वापर करून, भाजप आपल्या देशाचे मूळ स्वरूप बदलण्याचा प्रयत्न करीत आहे. काँग्रेस पक्ष आणि ‘यूडीएफ’ देशातील विविधता मान्य करतात. आम्ही आमच्या सर्व नागरिकांच्या अनेक भाषा, परंपरा, भिन्न इतिहासाचा आणि दृष्टिकोनाचा स्वीकार करतो. पण, भाजपला देशातील नागरिकांवर एक इतिहास, एक राष्ट्र, एक भाषा लादायची आहे. देशाच्या विविधतेत बदल करण्याचा भाजपचा हा प्रयत्न, असा आरोप त्यांनी केला.

‘पहिली गोष्ट म्हणजे ती (विविधता) कधीही बदलता येत नाही. तुम्ही तुमचा वेळ वाया घालवत आहात. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुम्ही भारतीय लोकांची ऊर्जाही वाया घालवत आहात. तुम्ही असहिष्णुता निर्माण करत आहात आणि ही असहिष्णुता लोकांना त्रासदायक ठरत आहे’, असेही राहुल गांधी म्हणाले.

… ही तर संविधान वाचवण्याची लढाई

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या एक दिवस आधी भारतीय जनता पक्ष भारताच्या विचारांवर हल्ला केला. तसेच ही साधी निवडणूक नसून, ही तर संविधान वाचवण्याची अटीतटीची लढाई आहे असे सांगत, ही बाब कार्यकर्त्यांनी नागरिकांपर्यंत घेऊन जावी, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले.

राहुल गांधी मॅच्युअर नाहीत, त्यांचं लॉन्चिंग अजून सक्सेस झालेलं नाही | एकनाथ शिंदे

‘तुम्ही आमच्या पक्षाचा कणा आहात. मला वाटले की, आता निवडणुकीची वेळ आहे, म्हणून मी तुमच्याशी थोडे थेट बोलले पाहिजे. ही केवळ सार्वत्रिक निवडणूक नाही. ही राज्यघटना आणि लोकशाही वाचवण्याची निवडणूक आहे. यामध्ये तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर मोठी जबाबदारी आहे. कारण काँग्रेस पक्षाची विचारसरणी आणि विचारधारा तुमच्या नसानसात भिनलेली आहे’, असे त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या व्हिडीओ संदेशात म्हटले आहे.

Source link

bjp wants to impose one historyloksabha election 2024Rahul Gandhirahul gandhi on bjpराहुल गांधीलोकसभा निवडणूक २०२४
Comments (0)
Add Comment