माझा जिल्हा, माझी जबाबदारी! कोणाला दिली सुट्टी, कोणी विमानाने आले; DM राबले, १००% मतदान झाले

लखनऊ: देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आहे. मतदानाचे सातपैकी पाच टप्पे पूर्ण झाले आहेत. महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व ४८ जागांवरील मतदान पूर्ण झालं आहे. राज्यातील १३ जागांवर काल मतदान झालं. मतदानाची सरासरी ५४ टक्के राहिली. अनेक ठिकाणी मतदारांचा निरुत्साह दिसला. दुसरीकडे उत्तर प्रदेशात काल ५८ टक्के मतदान झालं. ललितपूर जिल्हा आणि इथले जिल्हाधिकारी मतदानानंतर चर्चेचा विषय ठरले आहेत.

मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी ललितपूरचे जिल्हाधिकारी अक्षय त्रिपाठी केवळ बॅनर, पोस्टर लावून थांबले नाहीत. त्यांनी मतदारांना मतदान केंद्रांवर आणण्यासाठी त्यापुढे जाऊन प्रयत्न केले. शहरात रोजगारासाठी गेलेल्या अनेकांना त्रिपाठी यांनी मतदानासाठी ललितपूरमध्ये आणलं. कोणाला ऑफिसमधून सुट्टी मिळवून दिली, तर कोणाला विमानानं आणत त्रिपाठींनी मतदानाचा टक्का वाढवला. त्यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील ३ बूथवर १०० टक्के मतदान झालं.
Jayant Sinha: ना प्रचारात सहभाग, ना संघटनेत रस; पाचवा टप्पा संपताच भाजपकडून बड्या नेत्याला नोटिस
झाशी-ललितपूर मतदारसंघातील सगळ्यात जास्त मतदान ललितपूर विधानसभा मतदारसंघातच झालं. तीन गावांनी इतिहास रचला आहे. मडावरा ब्लॉकमधील सौलदा, बुदनी नाराहट आणि बिरघा ब्लॉकमधील बम्हौरी नागलमध्ये शत-प्रतिशत मतदान झालं. या गावांमधील काही मतदार कामासाठी बंगळुरु, दिल्लीत राहतात. त्यांना मतदानासाठी बोलावण्याचं काम जिल्हाधिकारी आणि त्यांच्या टिमनं केलं.
Nashik Lok Sabha Election: शहरात घासून सामना, ग्रामीणमध्ये ‘मशाल’ जोरात; गोडसेंची मतं ‘बादली’त? नाशकात गेम फिरणार?
ललितपूर जिल्ह्यात शांततेत मतदान व्हावं यासाठी जिल्हाधिकारी अक्षय त्रिपाठी अनेक दिवसांपासून कार्यरत होते. प्रशासनाकडून जनजागृती करण्यात आली. त्यांना मतदानासाठी प्रेरित करण्यात आलं. सौलदा गावात ३५७ मतदार आहेत. यातील एक मतदार शेरसिंह बंगळुरुत राहतात. सचिव, बीएलओनं त्यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर ते विमानानं भोपाळला आले. तिथून ते रस्तेमार्गानं ललितपूरला पोहोचले. यात त्यांना सचिव, सरपंचांनी मदत केली. या गावातील २६ जण जिल्ह्याबाहेर राहतात. हे सगळे जण मतदान करण्यासाठी २० मे रोजी गावात पोहोचले.

याचप्रकारे दिल्लीत निवडणूक कर्तव्यावर असलेल्या जयदीप यांना मतदान करण्यासाठी गावात बोलावण्यात आलं. त्रिपाठी त्यांच्या वरिष्ठांशी बोलले. त्यामुळे जयदीप यांना मतदानासाठी सुट्टी मिळाली. जयदीप यांनी बम्होरी नांगलमध्ये येऊन मतदान केलं. त्यामुळे गावाच्या नावावर १०० टक्के मतदानाचा विक्रम जमा झाला. इथल्या ४४१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

Source link

akshay tripathilalitpurlok sabha election 2024अक्षय त्रिपाठीललितपूरलोकसभा निवडणूक २०२४
Comments (0)
Add Comment