राजीव गांधींच्या हत्येच्या दिवशी नेमकं काय काय घडलं? पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या थरकाप उडवणारा प्रसंग

विमल पाटील, मुंबई : दिवस होता, २१ मे १९९१ संपूर्ण देशात थरकाप उडवणारी घटना घडली. देशाच्या पंतप्रधानांचा दहशतवादी बॉम्ब हल्ल्यात मृत्यू झाला आणि देश एका दूरदर्शी नेतृत्वाला मुकला. त्यावेळी श्रीलंकेच्या गृहयुद्धात भारत-श्रीलंकेत झालेल्या शांतता कराराच्या माध्यमातून भारताने नुकताच आपला सहभाग संपवला होता.

भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी हे १९९१ च्या मे महिन्यात जी. के. मूपनार यांच्यासोबत दक्षिणेकडील राज्यांत निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त होते. विशाखापट्टणम येथील प्रचार पार पाडून त्यांनी तामिळनाडूतील श्रीपेरुंबदूर गाठले. पांढऱ्या अंबॅसिडर कारमधून दोन तासांचा प्रवास करत ते चेन्नईमध्ये पोहोचले. श्रीपेरुंबदूर मध्ये पोहोचताच ते कारमधून उतरले आणि डाईस येथील सभेला जाण्यासाठी त्यांनी पायी रस्ता पकडला. वाटेत अनेक हितचिंतक, काँग्रेसचे कार्यकर्ते आणि शाळकरी मुलांनी गांधींना पुष्पहार घालून शुभेच्छा दिल्या. राजीव यांना कल्पना नव्हती की त्यांचा मारेकरी देखील याच हितचिंतकांच्या आडून आपल्यावर निशाणा साधणार आहे. ती मारेकरी पुढे आली, राजीव गांधींच्या पाया पडायला गेली आणि इतक्यात घात झालाच.

मारेकरी ‘धनू’ने गर्दीतच साधला डाव
मारेकरी कलैवानी राजरत्नम(धनू) ही गांधींच्या जवळ आली आणि तिने त्यांना नमस्कार केला. कलैवानी गांधींच्या पायाशी खाली वाकली आणि तिने स्वत:च्या पोशाखात दडलेल्या आरडीएक्स स्फोटक बेल्टचा स्फोट केला. यामध्ये कलैवानीसह राजीव गांधी आणि १४ अन्य लोक मारले गेले. तसेच इतर ४३ जण देखील या हल्ल्यात जखमी झाले आणि एकच खळबळ उडाली.

ही संपूर्ण घटना स्थानिक छायाचित्रकार हरिबाबू यांनी काढलेल्या कॅमेऱ्यात कैद झाली होती. हरिबाबू यांचा देखील राजीव गांधींसह हल्ल्यात मृत्यू झाला. पण नंतर त्या कॅमेरासह ती थरारक छायाचित्र अखंड स्थितीत आढळून आली होती.

भारत-श्रीलंका शांतता करार झाल्याने एलटीटीईमध्ये धुमसत होता वैरभाव
१९८७ मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात शांतता करार झाला होता, ज्यावर तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी स्वाक्षरी केली होती. करारानुसार, भारताने श्रीलंकेत आयपीकेएफ (इंडियन पीस कीपिंग फोर्स) नावाचे लष्करी दल पाठवायचे होते, ज्याला एलटीटीईला (लिबरेशन टायगर्स ऑफ तमिल इलम) आत्मसमर्पण करायला लावण्याची जबाबदारी होती. सुरुवातीला एलटीटीई आत्मसमर्पण करण्यास तयार होते. अनेक सामूहिक आत्मसमर्पणही झाले. पण तीन आठवड्यांतच ही शरणागती थांबली. न्यायमूर्ती केटी थॉमस यांनी दिलेल्या सर्वोच्च न्यायालयातील निकालानुसार श्रीलंकेतील तमिळींवरील कथित आयपीकेएफच्या अत्याचारांमुळे उद्भवलेल्या वैयक्तिक वैमनस्यामुळे गांधींची हत्या करण्यात आली होती.

राजीव गांधींवरील पहिल्या हल्ल्याचा कट, सुरक्षेत मोठी चूक, पण अनर्थ टळला
राजीव गांधींच्या हत्येचा पहिला कट १९८६ मध्ये महात्मा गांधीच्या जयंतीच्या काही दिवसांआधी आखला गेला. करमजित सिंग नावाच्या तरुणानं तो आखला होता आणि त्याने राजीव गांधींना गाठण्याचं स्थळ निवडलं राजघाटावरीव महात्मा गांधींची समाधी. महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त देशाचे पंतप्रधान त्यांना अभिवादन करण्यासाठी इथे येतात. हे जाणून हल्ला करण्याच्या आधी त्याने या स्थळाची रेकी केली होती.

गांधींच्या समाधीच्या मागे लपून तिथल्या झुडपांमधून हल्ला करण्याचा त्याने प्लॅन केला. कारण महात्मा गांधींची तिथून समाधी दृष्टीपथात होती आणि निशाणा साधणं त्याला सोपं गेलं असतं. परिसराचं नीट आकलन करुन करमजीतने २५ सप्टेंबरपासूनच समाधीस्थळी तळ ठोकला होता.

खरंतर इंदिरा गांधींच्या हत्येनंतर भारतीय पंतप्रधानांच्या सुरक्षेत मोठे बदल करण्यात आले होते. तसेच राजीव गांधी यांच्यावरील हल्ल्यासंदर्भात वारंवार सतर्क देखील करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर महात्मा गांधींच्या जयंतीदिवशी राजघाटावर अभूतपूर्व सुरक्षा देखील होती. स्क्रिनिंग आणि कोंबिंग ऑपरेशन २४ तास आधी करणं अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र आदल्या दिवशी ४ वाजता ते सुरु करण्यात आलं. ज्यामध्ये काहीच संशयास्पद आढळलं नाही. आणि अखेर मारेकऱ्याने राजीव गांधी राजघाटावर उपस्थित होताच सैन्याचा गणवेश चढवला. आणि इतक्यात समाधीच्या दिशेने चालत येणाऱ्या राजीव गांधींवर निशाणा साधलाच. करमजीतने झाडलेली गोळी राजीव गांधींना न लागता शेजारच्या हिरवळीवर पडली. सुरक्षा यंत्रणांनी लगेचच राजीव गांधी यांना घेरलं, पण राजीव यांनी पुढे चालणं सुरूच ठेवलं.

Source link

Congressipkfltteprime ministerrajiv gandhirajiv gandhi deathrajiv gandhi death anniversarysonia gandhiकाँग्रेसचे नेतृत्वदेशाचे यशस्वी पंतप्रधानराजीव गांधीराजीव गांधी हत्याहत्येचा प्रसंग
Comments (0)
Add Comment