यावेळी मात्र भगत यांनी मोठा दावा केला आहे. त्यांची पावभाजी इतकी लोकप्रिय आहे की, यावेळी १२ लाख मतांनी विजय होईल असे भगत यांनी म्हटले आहे. भगत यांच्या पावभाजीची गाडी गुरुग्रामच्या सिव्हिल लाइन येथे आहे.
गुरुग्राम मतदारसंघातून यावेळी एकूण २६ उमेदवार रिंगणात आहेत. ज्यात भगत यांचा देखील समावेश आहे. भगत यांची उमेदवारी चर्चेत येण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्यांनी फक्त लोकसभा आणि विधानसभा नाही तर दोन वेळा राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवली आहे. गुरुग्रामच्या सेक्टर १५ मध्ये १९९६पासून त्यांची पावभाजीची गाडी आहे. भगत यांच्या मते यावेळी येथील मतदारांना बदल हवा आहे.
कुशेश्वर भगत यांनी सांगितले की, या लोकसभा मतदारसंघात ९ विधानसभेचे मतदारसंघ येतात. ज्यात ९०० समस्या आहेत. त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही. गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेत असलेल्या नेत्यांबद्दल लोकांना आता काही वाटत नाही. लोकांना बदल हवा आहे.
२०१४च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना ७ हजार ९०० मते मिळाली होती. राष्ट्रपती निवडणुकीत पहिल्यांदा ७ लोकप्रतिनिधींनी तर दुसऱ्यांदा ३६ लोकप्रतिनिधींनी त्यांच्या अर्जावर स्वाक्षरी केली होती. दोन्ही वेळा अर्जावर आवश्यक लोकप्रतिनिधींचा पाठिंबा नसल्याने त्यांचा अर्ज रद्द झाला होता.