परमात्माने मोदींला अदानी – अंबानीसाठी पाठवले
देवरियातील सभेत राहुल गांधींनी पुन्हा पीएम मोदींवर पुन्हा निशाणा साधलाय, मोदींच्या ‘परमात्मा’ वरील विधानावर गाधींनी पुन्हा टीका केली. सगळे बयोलॉजिकल आहेत फक्त मोदी बायोलॉजिकल नाहीत, त्यांचा जन्म फक्त अदानी आणि अंबानीसाठी झालाय, परमात्माने त्यांना शेतकरी आणि मजदूरांच्या मदतीसाठी नव्हे तर अदानी आणि अंबानीसाठी पाठवले असा टोला गांधींनी लगावला. काही दिवसांपूर्वीच मोदींनी एका मुलाखतीत माझा जन्म बायोलॉजिकल झाला नसून आपल्याला परमात्माने पाठवले असे विधान केले होते याच विधानावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. युपीच्या प्रचारसभेत याच मुद्द्याला परत राहुल गांधींनी हात घालत मोदींवर थेट टीका केली.
जर परमात्माने खरंच मोदींना पाठवले असेल तर देशातील गरीब, मजदूर आणि शेतकरीवर्गांची मोदींनी सेवा केली असती पण तसे काही मोदी करत नाही. पण श्रीमंत असलेले अदाणी आणि अंबानीचे मोदी १६ लाख करोडचे कर्ज माफ करतात असे कोणता परमात्मा सांगतो? हाच मोदींचा परमात्मा आहे असे घणाघात राहुल गांधींनी युपीच्या सभेतून मोदींवर केलाय.
लोकसभेच्या तोंडावर पीएम मोदी अनेक माध्यमांवर मुलाखती देताना दिसतायत. याचाच संदर्भ घेत मोदींच्या मुलाखतीतील एका किस्सा राहुल गांधींनी भरसभेत बोलून दाखवलाय. काही चमचे मोदी तुम्ही आंबा कसे खाता असा सवाल करतात? मोदी उत्तर देतात मी काही करत नाही सगळे आपोआप होते असे म्हणत राहुल गांधींनी मोदींना डिवचले.