Vishnu Puran : सूर्य कोपणार! वाढत्या उष्णतेबाबत विष्णु पुराणातील भयंकर भविष्यवाणी वाचून व्हाल थक्क

Vishnu Puran On Heat Wave :

जगात जे काही घडणार आहे त्या सर्व घटनांचा उल्लेख आपल्याला पुराणात सापडतो. विष्णु पुराणातही आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या जीवनापासून मृत्यूपर्यंत अशा अनेक घटनांची माहिती मिळते.
विष्णु पुराणात पैशांबद्दल लिहिले आहे की, भविष्यात पैसा देव होईल आणि लोक देवाला सोडून पैशांची पूजा करतील. त्याचप्रमाणे विष्णु पुरणातही हवामान आणि निर्सगाच्या संबंधांचा उल्लेखही केला आहे. वाढत्या उष्णतेच्या संदर्भात विष्णु पुराणात अशा काही गोष्टी लिहिल्या आहेत, ज्या सध्या खऱ्या ठरत आहेत. जाणून घेऊया वाढत्या उष्णतेबद्दल विष्णु पुराणात काय लिहिले आहे.

1. तापमानाचा पारा वाढला

मे महिन्यात दिल्लीत तापमानाचा पारा ५० डिग्री अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे तर महाराष्ट्रात तापमानाच्या पाराने ४० डिग्री अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. वाढत्या गर्मीमुळे राज्यात उष्णतेच्या लाटा पाहायला मिळत आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये २९ मे पर्यंत उष्णतेची तीव्र लाट पाहायला मिळेल. अशातच विष्णु पुराणात लिहिलेल्या घटना आता खऱ्या होताना दिसत आहे.

2. विष्णु पुराणानुसार देवलोक आणि भूलोक

विष्णु पुराणानुसार स्वर्गात काळ वेगवेगळ्या प्रकारे फिरतो. पृथ्वीवर 12 महिन्यांचे एक वर्ष आहे परंतु स्वर्गात दिवस आणि रात्र 12 महिन्यांच्या समान असते. देवांना तीनशे साठ वर्षांचे वर्ष आहे. बारा हजार दिव्य वर्षांचे चतुरयुग आहे. त्यामुळे पृथ्वीवरील महिन्यांनुसार हवामानातील बदल दिसून येतात, परंतु देवलोकात हे बदल पृथ्वीपेक्षा शतकानुशतके उशिराने होतात असे म्हटले आहे.

3. उष्णता, थंडी आणि पाऊस कलियुगाचा शेवट

विष्णु पुराणानुसार जेव्हा एक चतुरयुग संपल्यानंतर पृथ्वी थकते तेव्हा 100 वर्षे दुष्काळ जाणवू लागतो. त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होतो. पृथ्वीची सुपीकता दिसून येते, यामुळे पिकांचे नुकसान होऊ लागते. जिवंत राहूनही मेल्यासारखे वाटते. तसेच शारीरिक ताकदही कमी होते. प्रचंड उष्णतेमुळे आजूबाजूला दुष्काळाचे सावट दिसू लागते. पाण्याची कमतरता आणि त्वचाही कोरडी होते.

4. भगवान विष्णू सूर्याच्या सात किरणांमध्ये स्थित

विष्णु पुराणानुसार, जेव्हा पृथ्वी तीव्र उष्णतेने त्रस्त असते, तेव्हा हे प्रलयकाळाचे लक्षण म्हटले जाते. त्यानंतर भगवान विष्णू सूर्याच्या सात किरणांमध्ये स्थित असल्याने सर्व पाणी स्वतःमध्ये शोषून घेतात. समुद्र, नद्या, पर्वतीय भागातील आर्द्रता आणि पाणी पूर्णपणे कमी होऊ लागते. भगवंताच्या या प्रभावाने सात सूर्यकिरण ताजेतवाने होऊन त्याचे सात सूर्य तयार होतात.

5. पृथ्वीची कयामताकडे वाटचाल

पृथ्वीवरील तीव्र उष्णता देखील जीवनाच्या समाप्तीचे संकेत देते. त्या वेळी वर आणि खाली सर्वत्र तेजस्वी प्रकाश असतो, कारण सात सूर्यकिरण पृथ्वीपासून पाताळापर्यंत त्रैलोकीला भस्म करतात. संपूर्ण जग, नद्या, पर्वत, जंगले सपाट होऊन संपतात. पृथ्वी अधिक कठोर होते. अतिउष्णता हे पृथ्वीच्या अंताचे लक्षण आहे. विष्णु पुराणानुसार उष्णतेमुळे आणि नंतर दुष्काळामुळे पृथ्वी विनाशाकडे जात आहे असे म्हटले आहे.

टीप :
ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.

Source link

Atmospherevishnu puranVishnu Puran BhavishyavaniVishnu Puran Predicition On Heat Waveweatherविष्णु पुराणा भविष्यवाणी
Comments (0)
Add Comment