घटना समोर आल्यानंतर सारेच चक्रावले. सामूहिक विवाहमध्ये मिळणाऱ्या पैशासाठी दुसरे लग्न करण्यासाठी चक्क दोन मुलांचे आईवडील पोहचले होते.संस्थेने सांगितले घटना समोर येताच अधिक तपास केले असता अनेक अल्पवयीन आणि लग्न झालेली जोडपी सामूहिक विवाहसोहळ्यात फक्त पैशांसाठी सहभागी झाल्याचे आढळले.
काही विवाहित जोडप्याविरोधात संस्थेने एफआयआर दाखल केली आहे.या संस्थेने आधीही अनेक लग्न लावून दिलीत पण यावेळी फक्त पैशांच्या आमिषामुळे हा प्रकार घडला असे दिसून येते, छत्तीसगड मधील अंबिकापुर, बिलासपुर, बस्तर आणि सरगुजा परिसरातून जोडपी आली होती. सामूहिक विवाह सोहळ्यात जवळपास ३०० जोडप्यांची लग्न लावणार होती पण यामध्ये शंभरहून अधिक व्यक्तींना संस्थेची फसवणूक केल्याचे आढळले.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णु देव साय आणि खासदार विजय बघेल यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यांवी काही दिव्यांग दाम्पत्याला आशीर्वाद सुद्ध दिला. पण याच दरम्यान विवाहित जोडपी आणि अल्पवयीन मुलांची ही बाब समोर आली. संस्थेकडून दावा केला जातोय की यामध्ये महाराष्ट्र, ओडिशा आणि झारखंडची सुद्धा काही जोडपी पैशांसाठी पोहचली होती.