नवी दिल्ली: केंद्रात भाजपला कायम मदत करणाऱ्या बिजू जनता दलाला ओडिशात मोठा धक्का आहे. संसदेत भाजपला पूरक भूमिका घेणाऱ्या, महत्त्वाच्या विधेयकांवर मोदी सरकारच्या बाजूनं मतदान करणाऱ्या बीजेडीच्या हातून राज्यातील सत्ता गेली आहे. ओडिशात विधानसभेच्या १४७ जागा आहेत. पैकी ४ जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. तर ७५ जागांवर भाजपला आघाडी आहे. त्यामुळे भाजप पहिल्यांदाच ओडिशात सत्ता स्थापन करण्याच्या दिशेनं वाटचाल करताना दिसत आहे.
मागील निवडणुकीत तब्बल ११२ जागा जिंकणाऱ्या बीजेडीला यंदा केवळ ५० जागा मिळताना दिसत आहेत. विशेष म्हणजे मोदी सरकारच्या दोन्ही टर्ममध्ये बीजेडीनं संसदेत सत्ताधाऱ्यांना वेळोवेळी मदत केली. काँग्रेसनं विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत सत्ताविरोधी आवाज बुलंद करण्याचे प्रयास केले. तेव्हा बीजेडीनं मोदी सरकारला सहाय्य केलं. पण आता त्याच भाजपनं ओडिशातील बीजेडीची सत्ता उलथवली आहे.
महाराष्ट्रात शिवसेना, भाजपची युती असताना बाळासाहेब ठाकरेंनी केंद्रात तुम्ही आणि राज्यात आम्ही असं सूत्र ठेवलं होतं. पण बाळासाहेबांच्या निधनानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं राज्यात दमदार कामगिरी केली. केंद्रात मोदी सरकार आलं. त्यानंतर भाजपनं राज्यात विस्तार सुरु केला. विधानसभा निवडणुकीत भाजपनं अधिक जागा मागितल्या. त्यावरुन तणातणी झाली आणि युती तुटली.
शिवसेनेप्रमाणेच बीजेडी केंद्रात भाजपला मदत करत होतो. दोन्ही पक्षांची युती नसली तरी त्यांची भूमिका मोदी सरकारला पूरक राहिली. पण भाजपनं गेल्या काही वर्षांत ओडिशात विस्तार सुरु केला. यंदा त्यांनी पूर्ण ताकदीनं विधानसभा लढवली आणि बीजेडीचा पराभव केला. त्यामुळे आता नवीन पटनायक यांना मुख्यमंत्रिपद सोडावं लागेल. ते गेल्या २४ वर्षांपासून राज्याचं नेतृत्त्व करत आहेत.
मागील निवडणुकीत तब्बल ११२ जागा जिंकणाऱ्या बीजेडीला यंदा केवळ ५० जागा मिळताना दिसत आहेत. विशेष म्हणजे मोदी सरकारच्या दोन्ही टर्ममध्ये बीजेडीनं संसदेत सत्ताधाऱ्यांना वेळोवेळी मदत केली. काँग्रेसनं विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत सत्ताविरोधी आवाज बुलंद करण्याचे प्रयास केले. तेव्हा बीजेडीनं मोदी सरकारला सहाय्य केलं. पण आता त्याच भाजपनं ओडिशातील बीजेडीची सत्ता उलथवली आहे.
महाराष्ट्रात शिवसेना, भाजपची युती असताना बाळासाहेब ठाकरेंनी केंद्रात तुम्ही आणि राज्यात आम्ही असं सूत्र ठेवलं होतं. पण बाळासाहेबांच्या निधनानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं राज्यात दमदार कामगिरी केली. केंद्रात मोदी सरकार आलं. त्यानंतर भाजपनं राज्यात विस्तार सुरु केला. विधानसभा निवडणुकीत भाजपनं अधिक जागा मागितल्या. त्यावरुन तणातणी झाली आणि युती तुटली.
शिवसेनेप्रमाणेच बीजेडी केंद्रात भाजपला मदत करत होतो. दोन्ही पक्षांची युती नसली तरी त्यांची भूमिका मोदी सरकारला पूरक राहिली. पण भाजपनं गेल्या काही वर्षांत ओडिशात विस्तार सुरु केला. यंदा त्यांनी पूर्ण ताकदीनं विधानसभा लढवली आणि बीजेडीचा पराभव केला. त्यामुळे आता नवीन पटनायक यांना मुख्यमंत्रिपद सोडावं लागेल. ते गेल्या २४ वर्षांपासून राज्याचं नेतृत्त्व करत आहेत.