दरम्यान, एनडीए आघाडीच्या वतीने नितीश आणि नायडू यांना आपल्या गोटात आणण्याचा इंडिया आघाडीचा प्रयत्न आहे. नितीश आणि नायडू यांनी एनडीएमधून माघार घेतल्यास पीएम मोदींना पुन्हा सरकार बनवणे कठीण होईल. युती सरकारमुळे पुढचे सरकार ‘जुगाड’वर आधारित असेल आणि भाजपला याच कुबड्यांवर अवलंबून राहावे लागणार आहे.
अंतरराष्ट्रीय संबंधांवर परिणाम होणार?
जरी भाजपने मित्रपक्षांबरोबर युती केली तर त्याचा पंतप्रधान मोदींवर फारसा परिणाम होणार नाही, असे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे तज्ज्ञ कमर आगा यांचे मत आहे. एनबीटी ऑनलाइनशी संवाद साधताना कमर आगा म्हणाले की, ”भारताचा पंतप्रधान जो कोणी आहे तो जगात नेहमीच मोठा असतो. भारत युनायटेड नेशन्स आणि इतर मंचांवर विकसनशील देशांचे प्रतिनिधित्व करतो. पीएम मोदींनी स्वत:ची प्रतिमा तयार केली होती. आणि त्यांच्याकडे काम करण्याची पद्धत होती. पंतप्रधान मोदींना युरोप आणि अमेरिकेशी संबंध अधिक विकसित करायचे होते. पाश्चिमात्य देशांना त्यांच्या हितसंबंधांचा भारताचा किती फायदा होतोय हे दिसत आहे का? हा प्रश्न आहे. त्याच वेळी, पंतप्रधान मोदींचे धोरण भारताच्या हिताला चालना देण्याचे राहिले आहे.
पंतप्रधान मोदींची उंची कमी होणार नाही
आगा पुढे म्हणाले की, ”पंतप्रधान मोदींच्या ‘इंडिया फर्स्ट’ धोरणामुळे पाश्चात्य देशांना अडचणी येत आहेत. पंतप्रधान मोदींनी आघाडी सरकार स्थापन केल्यास आफ्रिका, मध्य आशिया आणि आखाती देशांशी संबंध पूर्वीसारखेच राहतील. भारत युरोप आणि रशियाशी आपले संबंध तसेच ठेवेल. रशिया हा भारताचा सर्वात जवळचा मित्र आहे. पंतप्रधान मोदींनी अरब देशांमध्ये वैयक्तिक संबंध निर्माण केले आहेत. मला वाटत नाही की कमी जागांचा या देशांमधील पंतप्रधान मोदींच्या उंचीवर काही परिणाम होईल.पंतप्रधान मोदी त्यांच्या नवीन कार्यकाळात अमेरिका आणि युरोपशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करतील. चीनवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारताला अमेरिकेशी चांगले संबंध ठेवावे लागतील.”
दक्षिण आशियातील संबंध मजबूत करावे लागणार
पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या कारकिर्दीत त्यांच्यासमोर दक्षिण आशियातील संबंध हे सर्वात मोठे आव्हान असेल.सध्या चीन हा देश नेपाळ, श्रीलंका, मालदीव, पाकिस्तान आणि बांगलादेशशी आपले संबंध मजबूत करत आहे. त्यामुळे भारतासमोर सर्वात मोठे आव्हान दक्षिण आशियातून उभे राहिले आहे. मालदीवमधील मुइज्जू सरकार सातत्याने भारतविरोधी पावले उचलत आहे. त्यामुळे या संबंधावर मोदींना विशेष लक्षं ठेवावे लागणार आहे.