नेमकं काय घडलं ?
हा संपूर्ण प्रकार चंदिल-मुरी रेल्वे विभागातील सुईसा आणि तिरलडीहशी या भागात घडला. नीलांचल एक्सप्रेस धावत असताना अचानक मोठा आवाज झाला आणि पॅन्ट्रीची तार रेल्वेवर पडली. या प्रसंगी रेल्वेमध्ये उपस्थित असणाऱ्या तीन प्रवाशांना विजेचा झटका बसल्यामुळे गंभीर इजा झाली आहे. तर एका जणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात इतका गंभीर होता की एका व्यक्तीचा पूर्ण चेहराच फाटला आहे. तर इतर दोन जणांच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटना घडल्यानंतर दोन किलोमीटर पुढे जाऊन गाडी थांबली. त्यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण झाले आहे.
अनेक गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत
या अपघातामुळे संबंधीत मार्गावरून जाणाऱ्या अनेक गाड्या तात्काळ थांबवण्यात आल्या. त्यामुळे अनेक गाड्यांचे नियोजित वेळापत्रक विस्कळीत झाले आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
या अपघातासंदर्भात दक्षिण पूर्व रेल्वेच्या चक्रधरपूर विभागाचे वरिष्ठ डीसीएम यांनी अधिकची माहिती दिली आहे ते म्हणाले की, ”निलांचल एक्सप्रेस ट्रेनच्या बोगीच्या दरवाजाच्या परिसरात तीन प्रवासी उभे होते होते. या दरम्यान एक वायर येऊन त्याच्या अंगावर पडली. त्याचवेळी तो चालत्या ट्रेनमधून खाली पडला. त्यामुळे ही घटना कुणाच्या निष्काळजीपणामुळे घडली याचा तपास सुरू आहे.”