Assembly Elections महायुती की मविआसोबत लढणार? बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

नागपूर: आगामी विधानसभा निवडणुकीत आमची तिसरी युती होणार नसून शेतकरी आणि शेतमजुरांची युती असेल, अशी चर्चा सुरू आहे. आम्ही महाविकास आघाडीसोबत राहू की नाही ते ९ ऑगस्टनंतर आमची भूमिका स्पष्ट करू, असे मत आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केले. आमदार बच्चू कडू नागपुरात आले असता ते माध्यमांशी बोलत होते. प्रहारच्या वतीने ९ ऑगस्ट रोजी संभाजीनगरपर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला आहे. यामध्ये विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करणार आहो. कार्यकर्त्यांचे मत जाणून घ्यायचे आहे. आम्ही तिसरी आघाडी म्हणून कोणताही नवा पक्ष स्थापन करणार नसून शेतकरी, शेतमजूर आणि कामगार यांच्यासोबत आघाडी करणार आहोत.
६५ टक्के सरपंच शिवसेनेसोबत, भाजपकडील मतदारसंघ आपल्याकडे घ्या, जागा निवडून येईल, शिंदेंकडे मागणीबच्चू कडू म्हणाले की, संभाजीनगर मोर्चानंतर आमची राजकीय स्थिती स्पष्ट होईल, मात्र तोपर्यंत थांबा. रविकांत तुपकर आता शेतकऱ्यांसोबत काम करणार आहेत, आम्हीही अपंग आणि शेतकऱ्यांसाठी काम करत आहोत. याबाबत राजू शेट्टी यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नसून राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांच्या समन्वयाने चर्चा केली जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या सर्व नेत्यांनी एकत्र यायला हवे, असे आमचे मत आहे. राजू शेट्टी यांनी रविकांत तुपकर यांच्यावरील कारवाई ही त्यांची वैयक्तिक बाब असून आम्ही त्यावर बोलणार नाही. मात्र शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या सर्व नेत्यांना आणि पक्षांना एकत्र करण्याचा आमचा प्रयत्न असेल. मात्र आम्ही आमची भूमिका ९ ऑगस्टनंतर स्पष्ट करू, असे बच्चू कडू म्हणाले.

मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवली तर यात गैर काहीच नाही. प्रत्येकाची राजकीय महत्त्वाकांक्षा आणि काही उद्दिष्टे असतात. त्यांनी राज्यात विधानसभा निवडणुका लढायचे जाहीर केले असेल तर त्यात नवल वाटण्यासारखे काही नाही. त्यांना सोबत घ्यायचे की नाही याबाबत त्यांच्याशी चर्चा झाली नसल्याचे कडू यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला तुरुंगात टाकतील, असा जरांगे पाटील यांचा आरोप खरा असू शकतो, पण ते माझ्या हत्येचा कट रचत असल्याचा त्यांचा आरोप निराधार आहे. असे आरोप चुकीचे असल्याचे आमदार बच्चू कडू म्हणाले.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर लावलेल्या आरोपांची मला माहिती नाही. श्याम मानव यांनी कोणाची सुपारी घेतली किंवा कोणासाठी प्रचार करायचा हा मुद्दा आहे, असेही कडू यांनी कठोर शब्दात सांगितले. राज्य सरकारकडे निधी नाही. आमदारांकडे विकासासाठी पैसे नाहीत तर अजित पवार कसे देणार? आजही अल्पसंख्याकांना एकही दगड दिलेला नाही. मुस्लिम समाजासाठी वापरण्यात येणाऱ्या निधीसाठी अर्थसंकल्पात एक रुपयाचीही तरतूद करण्यात आलेली नाही, असं बच्चू कडू म्हणाले.

Source link

assembly elections newsBachu kadu Newsbachu kadu on assembly electionsbachu kadu statementबच्चू कडू बातमीबच्चू कडू विधानसभा निवडणूक वक्तव्यमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकविधानसभा निवडणूक अपडेट बातमी
Comments (0)
Add Comment