Crime News : घरच्या जेवणाला नकार दिला म्हणून, पत्नीने पतीवर केले सपासप वार

मुंबई : बंगलोरमध्ये नवरा बायकोच्या छोट्या भांडणाचे रुपातर भयानक क्राइम घटनेत घडलंय. पती (चैतन्य नाव बदलले) आणि पत्नी (आरती नाव बदलेले) यांचा २०२१ साली प्रेमविवाह झाला. चैतन्य मुळचा तामिळनाडूचा असून त्याचा हॉटेलचा व्यवसाय आहे. आरतीशी त्यांची ओळख एका मित्रा द्वारे झाली होती पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी विवाह केला. सारे काही ठीक सुरु होते पण एक छोट्या गोष्टीवरून त्यांची भांडण इतकी विकोपाला गेली की पत्नी आरतीने पती चैतन्यवर जीवघेणा हल्ला केला. पत्नीच्या माहेरावरुन आलेल्या जेवणाला पतीने नकार दिला म्हणून पत्नीने पतीवर जीवघेणा हल्ला केला. पतीला शेवटी सासरवाडीचा आश्रय घ्यावा लागला इतकेच नव्हे तर पत्नी विरोधात कसम ३२४ आणि कलम ५०४ कलम ५०६ अंतर्गंत गुन्हा सुद्धा दाखल करावा लागला.
Crime News: सोडाची चव वेगळी लागली, नवऱ्याने CCTV तपासलं अन् पत्नीला अटक, प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

नेमके काय घडले

बंगलोरच्या बनशंकरी भागात पती पत्नी राहत होते. दोघांना एक मुलगा सुद्धा आहे. पत्नीचे माहेर बाजूच्या इमारतीत होते. २६ जून रात्री चैतन्य आरती आणि मुलासह इमारतीच्या पार्कमध्ये फिरला नंतर त्याने पत्नी आणि मुलाला घरी सोडले आणि बाहेर जातो असे पत्नीला सांगून तो घराबाहेर पडला. बाहेर एका रेस्टॉरेंटमध्ये त्याने दारु घेतली आणि जेवण जेवला परत चैतन्य घरी येताच पत्नीने त्याला जेवणाचे ताट दिले. आरतीने माहेराहून जेवण आणले होते पण चैतन्य आधीच जेवल्याने त्याने जेवण करण्यास नकार दिला. आरतीने मग जेवण आवरुन आपल्या माहेराहून आणलेली सर्व भांडी आई वडिलांच्या घरी जात परत केली आणि परत ती घरी आली.

रात्री ११.३० वाजता आरतीचा राग अचानक अनावर झाला आणि तिने आंघोळीला जाण्याआधी चैतन्य वर ओरडायला सुरुवात केली. आरतीला मनात राग होता की नवरा आपण बनवलेले जेवण खात नाही पण त्याच्या आईच्या हातचे जेवण आवडीने खातो आणि भांडणात तिने याचा उल्लेख केला यावर चैतन्यने आपल्या आईला मध्ये भांडणात आणू नको असा आरतीला इशारा दिला. पण आरतीवर रागाचे भूत इतके चढले होते की तिने कैची हातात घेत सपासप नवऱ्यावर वार केले. चैतन्याने दरवाजा खोलून पळण्याचा प्रयत्न केला तर त्याचा पाठीत सुद्धा आरतीने कैची घुसवली. कसाबसा जीव वाचवत त्याने सासरवाडी गाठली, मग सासूने चैतन्यलाच ओरडत बायकोच्या विरोधात तक्रार करण्याचा सल्ला दिला. २८ जूनला चैतन्यने पोलीस स्थानकात बायको विरोधात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी दोघांना तपासासाठी बोलावले, दोघांनी एकमेकांवर गंभीर आरोप केलेत. दोघांचे समुपदेशन करुन त्यांना घरी पाठवण्यात आले.

Source link

bengaluru crime storiesbengaluru husbandbengaluru newsbengaluru wife killsbengaluru wife stabs husbandbengaluru wife try to kill husbandपती पत्नी भांडण बंगळुरुपत्नीने पतीवर केला हल्लाबंगळुरुत पत्नीने पतीला भोकसले
Comments (0)
Add Comment