Om Chanting: प्रत्येक मंत्राच्या उच्चारणाआधी ‘ॐ’ का लावले जाते? जाणून घ्या अर्थ आणि महत्त्व

Chant Om Meaning

ओम हा शब्द अ, उ आणि म या तीन अक्षरांच्या संयोगाने बनलेला आहे. हे संपूर्ण सृष्टीचे प्रतीक मानले जाते. तुम्ही ओम शब्दाचा पूर्ण श्रद्धेने उच्चार केला तर जीवनातून सर्व नकारात्मकता दूर होते. प्रत्येक मंत्रापूर्वी ओमचा जप करण्याचा अर्थ काय आहे? शास्त्र याबद्दल काय सांगतात? ते वाचूया

ओम शब्दाचा अर्थ

“ॐ” शब्द तीन अक्षरांनी बनलेला आहे. अ,उ आणि म. या शब्दांला सर्व सृष्टीचे प्रतीक मानले गेले आहे. “ॐ” हा ब्रह्मांडातून निर्माण झालेला पहिला ध्वनी आहे. ओमचा उच्चार केल्यामुळे एक निसर्गातील ऊर्जेची अनुभूती होते. ओम शब्दांत वेदांचे, तसेच तपस्वी आणि योगी यांचे सार सामवले आहे. जेव्हा आपण मंत्रांचा जप करतो, तेव्हा त्याची सुरुवात “ॐ”ने केली जाते. हिंदू धर्मग्रंथात सांगितले आहे की, जेव्हा आपण कोणत्याही मंत्राआधी “ॐ” लावतो, तेव्हा असे केल्याने त्या मंत्राची शक्ती संपन्न होते आणि हा मंत्र पूर्णतः शुद्ध होतो.

“ॐ” संदर्भातील मान्यता

” imgsize=”2007446″/>

मान्यता अशी आहे की “ॐ” शिवाय कोणताही मंत्र फलदायी ठरत नाही. “ॐ” शब्द लावल्याने त्या मंत्राची शक्ती कैकपटीने वाढते. दुसरी एक मान्यता अशी आहे की जर आपण कोणत्याही मंत्राचा जप करण्यापूर्वी “ॐ” लावतो, तेव्हा तो मंत्र जप करतान झालेली चूक ही मान्य राहात नाही. ती चूक “ॐ” शब्द लावल्याने शुद्ध होते. “ॐ” शब्दचा वापर केल्याने मंत्र उच्चारणावेळी जर काही व्यक्तीकडून काही अशुद्धी राहिली असेल तर त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा दोष लागत नाही, असे ही सांगतात.

“ॐ” मुळे मंत्रांची शक्ती वाढते

” imgsize=”2557996″/>

प्रत्येक मंत्राआधी “ॐ” लावले जाते, त्यानंतरच मंत्राची सुरुवात होते. यामागे बरीच कारणे आहेत, ज्यांच्या उल्लेख शास्त्रांत केलेला आहे. भगवद्गीतेत सांगितल्यानुसार मंत्राआधी ॐ लावणे पूण्यकारक असते. ॐ लावून कोणत्याही मंत्राचा जप केला तर त्या मंत्राची शुद्धी होते. मंत्रोच्चारणात गती येते आणि तो मंत्र सिद्ध होतो. मंत्राची शक्ती “ॐ” लावल्याने कैकपट वाढते. ॐ मध्ये सर्व वेदांचे धर्मशास्त्रांचे सार सामावले आहे. अशा स्थितीत मंत्राआधी “ॐ” लावणे म्हणजे सर्व धर्मशास्त्रांचे पठण केल्यासारखे आहे. तसेच “ॐ”लावून मग मंत्र पठण केल्याने इच्छापूर्ती होते.

“ॐ” चे अनोखे महत्त्व

” imgsize=”2395397″/>

केवळ सनातन धर्मच नव्हे तर भारतातील इतर धार्मिक तत्त्वज्ञानांनीही ओम या शब्दाचे महत्त्व मान्य केले आहे. बौद्ध तत्वज्ञानात, “मणिपदमेहुम” चा वापर मोठ्या प्रमाणावर जप आणि उपासनेसाठी केला जातो. या मंत्रानुसार, ओम “मणिपूर” चक्रात स्थित मानले जाते. हे चक्र दहा पाकळ्या असलेल्या कमळासारखे आहे. जैन तत्त्वज्ञानातही ओमचे महत्त्व सांगण्यात आले आहे. महात्मा कबीरांनीही ओमचे महत्त्व मान्य केले आणि त्यावर “साखियां” लिहिली. गुरु नानकजींनीही ओमचे महत्त्व सांगितले आहे.

असे मानले जाते की, “ॐ” न लावता केलेल्या मंत्रोचारणाचा कोणताही लाभ होत नाही. “ॐ” न लावता मंत्र जप केल्याने तो शुद्ध मानला जात नाही.”ॐ”सोबत मंत्र जप केल्याने मनोकामना पूर्तीसाठी श्रेष्ठ मानले जाते. या कारणामुळे प्रत्येक मंत्राआधी बोलले जाते “ॐ” !

Source link

Chant om before any mantraOm Chanting Importanceom mantras to chant in the morningइच्छापूर्तीसाठी ॐ चे महत्त्वओम मंत्राचा अर्थओमचे महत्त्वमंत्रांच्या आधी ओमॐ मुळे मंत्रांची शक्ती वाढतेॐ संदर्भातील मान्यता
Comments (0)
Add Comment