Rahul Gandhi Parliamentary Speech: ‘नीट’ परीक्षा प्रकरण ते ‘हिंदुत्व’ राहुल गांधींनी सगळंच काढलं, पंतप्रधान मोदी, अमित शहा, राजनाथसिंह यांना उत्तर द्यावं लागलं

नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणूक पार पडल्या असून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरवात झाली आहे. आजच्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी आज संसदेत भाषण केलं या भाषणावेळी नीट परीक्षा प्रकरण,अग्निवीर योजना आणि ईडी या मुद्यांवरून भाजपला कोंडीत पकडले.

राहुल गांधी यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे –

1)नीट परीक्षेवरून टीका

विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी नीट परीक्षा प्रकरणावरून भाजपवर टीका केली आहे ते म्हणाले की, ” NEET विद्यार्थी त्यांच्या परीक्षेची तयारी करण्यात वर्षानुवर्षे खर्च करतात. त्यांचे कुटुंब त्यांना आर्थिक आणि भावनिकदृष्ट्या समर्थन देत असतात. परंतु आज विद्यार्थी NEET च्या परीक्षेवर विश्वास ठेवत नाहीत. कारण त्यांना माहीत आहे की ही परीक्षा श्रीमंत लोकांसाठी आयोजित केली जाते गुणवंत लोकांसाठी नाही”.

2) अग्निवीराला ‘शहीद’ का म्हणत नाही ?

राहुल गांधी यांनी अग्निवीर योजनेवरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, ”लँडमाइनच्या स्फोटात एका अग्निवीरने आपला जीव गमावला पण त्याला ‘शहीद’ म्हटले जात नाही ‘अग्नवीर’ हा वापर करा अन् फेकून द्या असा कामगार आहे का?”.

3) तुम्ही हिंदू नाही

हिंदुत्वाच्या मुद्यावरून राहुल गांधी यांनी भाजपवर घणाघात केला आहे. ते म्हणाले की, ”अभयमुद्रा हे काँग्रेसचे प्रतीक आहे. अभयमुद्रा ही निर्भयतेची हावभाव आहे, आश्वासन आणि सुरक्षिततेचा हावभाव आहे. जी भीती दूर करते आणि हिंदू, इस्लाममध्ये दैवी संरक्षण आणि आनंद देते. शीख धर्म, बौद्ध आणि इतर भारतीय धर्म आपल्या सर्व महापुरुषांनी अहिंसा आणि भय संपविण्याबद्दल सांगितले आहे.पण, जे स्वतःला हिंदू म्हणवतात ते फक्त हिंसा, द्वेष, असत्याबद्दल बोलतात असतात आप हिंदू हो ही नही”.

4) संविधान आणि ईडीवरून घणाघात

राहुल गांधी यांनी संविधान आणि ईडीवरून सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, ” भारताच्या कल्पनेवर, संविधानावर आणि संविधानावरील हल्ल्याचा प्रतिकार करणाऱ्या लोकांवर पद्धतशीरपणे आणि मोठ्या प्रमाणावर हल्ला झाला आहे. आपल्यापैकी अनेकांवर वैयक्तिक हल्ले झाले आहेत. सत्ता आणि संपत्तीचे केंद्रीकरण, गरीब, दलित आणि अल्पसंख्याक यांच्यावर होणारे आक्रमण याला विरोध करणारे नेते आजही तुरुंगात आहेत. माझ्यावर भारत सरकारच्या आदेशाने हल्ला झाला. त्यातील सर्वात आनंददायी भाग म्हणजे माझी ईडीने केलेली ५५ तासांची चौकशी होय”.

5) शेती कायद्याचा फायदा अदानी आणि अंबानी फायद्याचा

राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांबाबत सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, ” शेतकऱ्यांना घाबरवण्यासाठी तुम्ही तीन नवीन कायदे आणले. हा कायदा त्यांच्या फायद्यासाठी असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. परंतु हा कायदा अदानी आणि अंबानी यांच्या फायद्याचा होता”.

6) सभागृहाच्या नेत्याने कुणापुढे झुकता कामा नये

राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, ” अध्यक्षजी, मोदींनी तुमच्याशी हस्तांदोलन केले आणि जेव्हा मी तुमच्याशी हस्तांदोलन केले तेव्हा माझ्या लक्षात आले की मी तुमच्याशी हस्तांदोलन केले तेव्हा तुम्ही सरळ उभे राहून माझ्याशी हस्तांदोलन करत होता. जेव्हा मोदीजी तुमच्याशी हस्तांदोलन करत होते, तेव्हा तुम्ही वाकून हात हलवत होता. तुम्ही या सभागृहाचे नेते आहात, तुम्ही कुणापुढे झुकता कामा नये.”

Source link

narendra-modi-3 TOPICParliament mansoon session 2024parliament monsoon sessionRahul Gandhi Parliamentary SpeechRahul Gandhi TOPICसंसद अधिवेशनसंसद पावसाळी अधिवेशन 2024संसद भवनसंसदीय पावसाळी अधिवेशन
Comments (0)
Add Comment