पळून पळून कुठे जाईल? दोषींवर कारवाई होणारच, राजकोटाच्या पाहणीनंतर अजितदादांचा शब्द

Sindhudurg News: नव्याने पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभे करत असताना या किल्ल्याच्या आजूबाजूला लागून असलेली खासगी काही नागरिकांची जमीन आहे ती सुद्धा योग्य दराने स्मारकासाठी घेतली जाणार आहे.

हायलाइट्स:

  • राजकोट किल्ल्याच्या बाजूची जागा राज्य सरकार विकत घेणार
  • स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन ही जागा विकत घेतली जाणार
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला साजेसं असं पुन्हा नव्याने स्मारक उभे करणार
Lipi
अजित पवार राजकोट किल्ला प्रतिक्रिया
सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सिंधुदुर्गातील मालवण राजकोट किल्ल्यावर दाखल झालेले असून आज त्यांनी संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आलेल्या त्या ठिकाणी पाहणी केली. ”जी घटना दोन दिवसांपूर्वी घडली त्या घटनेचा सर्वांना दुःख आहे आणि घडलेली घटना ही योग्य नसून योग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज उभ्या महाराष्ट्राचे दैवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल सर्वांना अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक पुतळे सिंहासनावर बसलेले आणि उभे असलेले अशा वेगवेगळ्या प्रकारचे पुतळे आहेत. तिथे आपण आदराने नतमस्तक होत असतो. त्यातून नवीन पिढीला प्रेरणा, आनंद, समाधान मिळत असतं. त्यानंतर जी राजकोटमधील परिस्थिती घडली त्यानंतर सर्वांचे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत”, असं अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.”या घडलेल्या घटनेबाबतची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला साजेचा असा पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या राजकोट किल्ल्यावर उभा केला जाणार आहे. असा निर्णय राज्य सरकारचा झाला आहे. नव्याने पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभे करत असताना या किल्ल्याच्या आजूबाजूला लागून असलेली खासगी काही नागरिकांची जमीन आहे ती सुद्धा योग्य दराने स्मारकासाठी घेतली जाणार आहे. ज्यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं, त्यावेळी किल्ल्याचे आजूबाजूला असलेली जमिनीचा देखील विचार केला गेला होता. आत्ताच मी या संदर्भात अधिकाऱ्यांची देखील बोललो त्यावेळी इथले नागरिक किल्ल्याचे किल्ल्यासाठी जमीन देण्यास तयार आहेत. जी जमिनीची किंमत असेल त्या जमिनीची व्हॅल्युएशन करून योग्य दर मिळून दिला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुन्हा पुतळा राजकोट किल्ल्यावर उभारत असताना संपूर्ण योग्य ती काळजी घेऊन आणि बारकाईने लक्ष घालून या राजकोट किल्ल्यावर पुतळा उभारला जाणार आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हा विषय गांभीर्याने घेतला आहे”, असं आश्वासन देखील दादांनी दिलेलं आहे.
काँग्रेसला ‘अपेक्षित’ धक्का, क्रॉस व्होटिंग संशयित आमदाराचा राजीनामा, भाजपच्या वाटेवर

”समुद्राच्या काठी वेगवेगळ्या महापुरुषांचे पुतळे दिमाखात उभे आहेत. हे पुतळे उभे करत असताना समुद्रकिनारी वाऱ्याचा वेग किती असेल? त्याची उंची किती असली पाहिजे? टेक्चर कसं असलं पाहिजे? याचा संपूर्ण अभ्यास केला जातो. पाठीमागच्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रामध्ये उभा करण्याचं चर्चा चाललेली होती. वेगवेगळ्या सरकारने निर्णय घेतले पण मात्र पुढचा निर्णय कोर्टामध्ये गेल्यामुळे ते तिथे अडकून पडलेला आहे. मात्र राजकोट शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात ज्या चुका झाल्या त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात जे दोषी ठरले त्या दोघांवर गुन्हा दाखल झाला असून अटक करण्याची कारवाई सुरू आहे.

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

ajit pawar breaking newsajit pawar rajkot fort reactionrajkot shivaji maharaj statue collapsedsindhudurg shivaji maharaj statue collapsedअजित पवार ब्रेकिंग बातम्याअजित पवार राजकोट किल्ला प्रतिक्रियाराजकोट शिवाजी महाराज पुतळा कोसळलासिंधुदुर्ग शिवाजी महाराज पुतळा
Comments (0)
Add Comment