गेल्या वर्षभरापासून बाजारात लसूणाचे दर वाढते राहिले आहेत. पाच महिन्यापूर्वी हे दर ४०० रु किलो झाले होते. त्यामुळे सर्वाना लसूणच्या वाढत्या दराने , अवाक केलं होते कारण लसूण कधीही ४०० रु किलो पर्यंत गेला नव्हता. मागच्या वर्षी लसूणाची लागवड फारच कमी प्रमाणात झाली होती. त्यामुळे बाजारात लसूण हि कमी दाखल होत होता. बाजारातील मागणी पेक्षा फक्त ६० टक्के लसूण बाजारात उपलब्ध होत आहे. त्यामुळे मागणी इतका पुरवठा होत नसल्याने, दर वाढत आहे.
मुंबईच्या घाऊक बाजारात नेहमी लसूणच्या आठ ते दहा गाड्या येत असतात. मात्र सध्या केवळ २ किंवा ३ गाड्याचं लसूण बाजारात दाखल होत आहे. मंगळवारी तर केवळ ९७ गोणी लसूण बाजारात आलाआहे . त्यामुळे बाजारातील लसूणाची मागणी पूर्ण होत नाहीय . बाजारात सध्या मध्य प्रदेश , राजस्थान आणि अधून मधून गुजरात च्या लसूणाची आवक होत आहे. घाऊक बाजारात देशी म्हणजेच गावठी लसूण हि उपलब्ध आहे. मात्र वाढत्या मागणीमुळे लसूणाची कमी बाजारात जाणवत आहे . त्यामुळे लसूणाची दरवाढकायम झाली आहे .
फेब्रुवारी मार्च महिन्यात लसूण , किरकोळ बाजारात ४०० रु किलो झाला होता .मे महिन्यात लसूणाचे दर २०० ते २५० रु किलो वर आले होते. मात्र जुलै अखेर पासून पुन्हा लसूणाचे दर वाढायला सुरुवात झाली असून, घाऊक बाजारात लसूण ,१५० ते २००,२०० ते २५० ,२५० ते २७० रु किलो झाला आहे. अशी माहिती घाऊक व्यापारी मनोहर तोतलानी यांनी दिलीआहे . तर किरकोळ बाजारात लसूण ३०० ते ४०० रु किलो झाला आहे . आकाराने लहान असणारा लसूण ३०० रु किलो आहे . तर मोठ्या पाकळ्यांचा लसूण ३५० ते ४०० रु किलो झाला आहे . त्यामुळे लसूण खरेदी कसा करावा असा प्रश्न सर्वाना पडत आहे .