Solapur Crime News: तिघा मित्रांच्या अत्याचाराला कंटाळून विवाहित महिलेची आत्महत्या
मंगळवेढ्याच्या ग्रामीण भागात एका विवाहित महिलेवर तिघा मित्रांनी जबरी अत्याचार करून शारिरिक, मानसिक त्रास दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिलेला तिच्या दोन मुलांना जीवे मारून टाकण्याची धमकी सुद्धा देण्यात आली होती. तिघा नराधमांच्या त्रासाला कंटाळून इज्जतीला घाबरून त्या पीडित विवाहित महिलेने तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण मंगळवेढा तालुका आणि सोलापूर जिल्हा हादरून गेला आहे.