Latur News : नदीच्या प्रवाहात बैल धुवायला गेलेल्या तरुण शेतकऱ्यावर बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला काळाचा घाला
मागील २४ तासांपासून लातूर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दरम्यान जळकोट तालुक्यातील ढोर सांगवी येथील युवा शेतकरी नरेश अशोक पाटील हे बैल पोळ्याच्या निमित्ताने आपल्या शेतीजवळील नदीत बैलाला धूवायला गेले असता अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे ते बैलासकट वाहून गेले. बैल मात्र सुखरूप बाहेर निघाला, ही घटना दुपारी १ च्या सुमारास घडली. शेतकरी नरेश यांचा शोध गावकरी दुपारी २ वाजल्यापासून घेत होते, मात्र नरेशचा मृतदेह आढळून आला नाही.