कॉंग्रेसची जादू ओसरली, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पुण्यातून कॉंग्रेस गायब; तिन्ही उमेदवार पराभूत

Pune Congress: सुरेश कलमाडी यांच्यानंतर शहरव्यापी नेतृत्वाचा काँग्रेसचा शोध संपलेला नाही आणि तो लवकर संपेल अशी स्थिती सध्या नाही. एके काळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यात पक्षाला लोकसभा आणि आता विधानसभा निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही.

महाराष्ट्र टाइम्स
congress flag fb.

पुणे : काँग्रेसच्या स्थापनेस कारण ठरलेल्या पुण्यातूनच काँग्रेस गायब झाली आहे. स्वातंत्र्यानंतर ही घटना पहिल्यांदाच घडली आहे. आता शहरासह जिल्ह्यात काँग्रेसचा ना खासदार आहे ना आमदार ! विधानसभा निवडणुकीत कसबा पेठ, भोर आणि पुरंदर या तीन जागी पराभव झाल्याने काँग्रेस आता नावालाही उरलेली नाही. काँग्रेसच्या इतिहासातील सर्वांत आव्हानात्मक काळ समोर असल्याने गटातटात विभागलेले स्थानिक नेते किमान आता तरी एकत्र येणार का, हा प्रश्न आहे.

सुरेश कलमाडी यांच्यानंतर शहरव्यापी नेतृत्वाचा काँग्रेसचा शोध संपलेला नाही आणि तो लवकर संपेल अशी स्थिती सध्या नाही. एके काळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यात पक्षाला लोकसभा आणि आता विधानसभा निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही. रवींद्र धंगेकर (कसबा पेठ), संग्राम थोपटे (भोर) आणि संजय जगताप (पुरंदर) या तीन आमदारांच्या पराभवाने पक्षाची शहरासह जिल्ह्यातीलही पाळेमुळे उखडली गेली आहेत. माजी राज्यमंत्री रमेश बागवे (पुणे कँटोन्मेंट) आणि दत्ता बहिरट (शिवाजीनगर) यांनाही पुन्हा पराभवाची चव चाखायला मिळाली आहे. शहरासह जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांपैकी एकही जागा न मिळणे, ही काँग्रेससाठी शोकांतिका आहे. स्वातंत्र्यानंतर १९५२मध्ये देशात पहिल्यांदा विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र झाल्या.
अपेक्षित निकालांसाठी दबाव, माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांची कबुली, राजकारणावरही भाष्य
निवडणुकीपासून सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचा शहरावर वरचष्मा राहिला. त्याआधीपासून पुणे काँग्रेसच्या नेत्यांचा गड होताच. १९७८ पर्यंत काँग्रेस अभेद्य होती. त्यानंतर पक्षात फूट पडली तरी जिल्ह्यावर काँग्रेसचे वर्चस्व कायम राहिले. शरद पवार यांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्याने पक्षात पुन्हा मोठी फूट पडली आणि तेव्हापासून काँग्रेसची शक्ती क्षीण होण्यास सुरुवात झाली. स्थानिक राजकारणात पक्षाची दोन शकले झाली. २००४ आणि २००९मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आघाडीमध्ये काँग्रेसने जिल्ह्यातील दोन आणि शहरातील चार जागा लढवल्या आणि काही जिंकल्याही. मात्र, २०२४च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला जिल्ह्यात एकदी जागा जिंकता आली नाही.
कोण होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री? निवडणुकीतील विजयानंतर महायुतीत खल; शीर्षस्थ नेते घेणार निर्णय
अंतर्गत लाथाळ्यांनी पक्ष ग्रस्त

२०१४च्या मोदी लाटेत शहरात आठपैकी आठ आमदार भाजपचे निवडून आले. तेव्हा जिल्ह्यात भोरमध्ये संग्राम थोपटे यांच्या विजयाने पक्षाची लाज राखली. मागील निवडणुकीत भोर आणि पुरंदर या जागा काँग्रेसने जिंकल्या. मात्र, शहरातील अपयश दूर सारता आले नाही. भाजपच्या मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे फेब्रुवारी २०२३मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांच्या विजयाने शहर काँग्रेसमध्ये ऊर्जा निर्माण झाली. मात्र, अंतर्गत लाथाळ्यांनी ग्रस्त झालेल्या काँग्रेसची अवस्था पुणे लोकसभा आणि आता विधानसभा निवडणुकीतील पराभवाने दयनीय झाली आहे. निस्तेज झालेल्या काँग्रेस भवनच्या ऐतिहासिक वास्तूला कार्यकर्ते आणि स्थानिक नेते पुन्हा वैभवाचे दिवस दाखवतील का, याचे उत्तर मिळण्यास आता बरीच वर्षे असल्याने काँग्रेसचे चित्र धूसर आहे.

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Congress Faces Wipeout In Punemaharashtra pune assembly election results 2024pune assembly election 2024pune congress newspune election resultरवींद्र धंगेकरविधानसभा निवडणूक २०२४संग्राम थोपटेसुरेश कलमाडी
Comments (0)
Add Comment