विधानसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालाय. कोल्हापूर जिल्ह्यातूनही महाविकास आघाडी हद्दपार झाली. कोल्हापूरच्या सर्व दहा विधानसभा मतदारसंघात महायुतीनेच बाजी मारली आहे. महायुतीच्या विजयानंतर सर्व दहा उमेदवारांना मुंबईत बोलवण्यात आलंय. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत सर्व आमदारांची बैठक होणार आहे. यासाठी कोल्हापुरात विशेष चार्टर्ड विमान पाठवण्यात आले असून उमेदवार मुंबईला रवाना झाले. खासदार धनंजय महाडिक आणि धैर्यशील मानेंवर जबाबदारी सोपवण्यात आली होती.