राज्याच्या विधान परिषदेकडे राज्याच्या विधान परिषदेकडे ज्येष्ठांचे सभागृह म्हणून पाहिले जाते. परंतु, गेल्या काही वर्षांपासून पक्षातील असंतुष्टांचे पुनर्वसन करण्यासाठी परिषदेचे सदस्यपद देण्यात येते. तरीही विधानसभेचा सदस्य होण्याची सुप्त इच्छा नेत्यांमध्ये असतेच. ज्येष्ठांचे सभागृह म्हणून पाहिले जाते. परंतु, गेल्या काही वर्षांपासून पक्षातील असंतुष्टांचे पुनर्वसन करण्यासाठी परिषदेचे सदस्यपद देण्यात येते. तरीही विधानसभेचा सदस्य होण्याची सुप्त इच्छा नेत्यांमध्ये असतेच.
हायलाइट्स:
- विधान परिषदेतील नऊ सदस्यांना उमेदवारी
- विजयामुळे आता विधान परिषदेत चार जागा रिक्त
- जिंकलेले चारही उमेदवार महायुतीचे
भाजपचे राम शिंदे यांनी कर्जत-जामखेडमधून राष्ट्रवादी काँग्रेस-शप पक्षाचे विद्यमान आमदार रोहित पवार यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. यात शिंदे यांचा १,२४३ मतांनी निसटता पराभव झाला. शिवसेनेच्या भावना गवळी यांना विधान परिषदेचे सदस्यत्व जुलै महिन्यातच मिळाले होते. त्यांनी रिसोडमधून विधानसभा निवडणूक लढवली. काँग्रेसच्या अमित झनक यांनी त्यांचा १६ हजार मतांनी पराभव केला. लोकसभेत सातारा मतदारसंघातून पराभूत राष्ट्रवादी काँग्रेस-शप शशिकांत शिंदे यांना झालेल्या पक्षाच्या कोरेगाव मतदारसंघात शिवसेनेच्या महेश शिंदे यांच्याकडून ४५,०६३ मतांनी पुन्हा पराभव स्वीकारावा लागला. तर अजित पवार यांच्यासोबत गेलेले औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातील आमदार सतीश चव्हाण यांनी गंगापूरमधून निवडणूक लढविण्यासाठी पक्षांतर करत राष्ट्रवादी-शप पक्षात प्रवेश केला, परंतु, भाजपच्या प्रशांत बंब यांनी त्यांचा ५,०१५ मतांनी पराभव केला.
भावना गवळी यांचे सदस्यत्व २०३० पर्यंत, शशिकांत शिंदे आणि सतीश चव्हाण यांचे २०२६ पर्यंत तर राम शिंदे यांच्या सदस्यत्वाची मुदत २०२८ पर्यंत आहे. परंतु, पराभव झाला तरीही त्यांची आमदारकी कायम राहणार आहे. परिषदेतील चार सदस्य विजयी झाल्याने सभागृहात आता या जागा रिक्त झाल्या आहेत.