नागपूर, दि. 21 : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना वंदन करुन प्रेरणा व नवी ऊर्जा मिळते. दीक्षाभूमीला आल्यानंतर नेहमीच वेगळी अनुभूती व समाधानही मिळते, अशा भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केल्या.
उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, दीक्षाभूमी ही तप आणि आदर्शाची भूमी आहे. बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होवून देश-विदेशातील अनुयायी येथे येतात व प्रेरणा घेतात. बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच देशाचा व राज्याचा कारभार चालत आहे. बाबासाहेबांचे विचार सर्वसामान्यांना न्याय देणारे व जनसेवेला बळ देणारे आहेत. राज्यशासनाच्या वतीने तालुकानिहाय संविधानभवन बांधण्यात येत आहेत. तसेच चैत्यभूमीवर जागतिक दर्जाचे स्मारक बांधण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
0000