मग ‘ती’ चार खाती आम्हाला द्या! ‘एक्स्चेंज ऑफर’वरुन सेना आक्रमक; भाजपच्या कोंडीचे प्रयत्न

Maharashtra Politics: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १० दिवस उलटले आहेत. पण अद्याप तरी सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला नाही. गेले काही दिवस साताऱ्यात, ठाण्यात मुक्कामी असलेले एकनाथ शिंदे वर्षावर पोहोचले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १० दिवस उलटले आहेत. पण अद्याप तरी सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला नाही. गेले काही दिवस साताऱ्यात, ठाण्यात मुक्कामी असलेले एकनाथ शिंदे वर्षावर पोहोचले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. त्यांच्यात सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं महत्त्वाची चर्चा अपेक्षित आहे.

मुख्यमंत्री भाजपचाच होणार हे निश्चित आहे. शिवसेनेच्या वाट्याला उपमुख्यमंत्रिपद जाणार आहे. मागील सरकारमध्ये भाजपनं अनेक महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवली होती. त्या खात्यांसाठी आता शिवसेना आक्रमक झाली आहे. उपमुख्यमंत्रिपदासह महत्त्वाची खाती मिळावीत यासाठी शिवसेनेनं दबाव वाढवला आहे. त्यामुळे खातेवाटपाचा तिढा कायम आहे.
Ajit Pawar: शिंदे रुसले, आता दादाही अडून बसले; दिल्लीत तळ ठोकला, शहांना भेटणार; मागण्यांची जंत्री समोर
२०२२ मध्ये राज्यात शिवसेना, भाजपचं सरकार आलं. ४० आमदार असलेल्या शिवसेनेला भाजपनं मुख्यमंत्रिपद दिलं. त्याबदल्यात बरीचशी महत्त्वाची खाती भाजपनं स्वत:कडे ठेवली. अर्थ, गृह, महसूल, सार्वजनिक बांधकाम विभाग भाजपच्या मंत्र्यांकडे होते. आता याच ४ शक्तिशाली खात्यांसाठी शिवसेना आग्रही आहे. उपमुख्यमंत्रिपद फडणवीसांकडे असताना त्यांच्याकडे असलेली खाती आता आम्हाला मिळावीत. आम्ही उपमुख्यमंत्रिपद स्वीकारतो, असा शिवसेनेचा पवित्रा आहे.

राज्य सरकारमध्ये गृह, अर्थ महत्त्वाची खाती मानली जातात. त्यानंतर महसूलचा क्रमांक लागतो. अर्थ खातं पुन्हा एकदा अजित पवारांच्या रुपात राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार आहे. त्यामुळे शिवसेना गृह मंत्रिपदासाठी आग्रही आहे. पण भाजप गृह खातं सोडण्यास तयार नसल्यानं विषय ताणला गेला आहे. सध्याच्या घडीला वर्षावर शिंदे आणि फडणवीस यांची बैठक सुरु आहे. त्या बैठकीत काय निर्णय होणार याकडे लक्ष लागलं आहे.
भाजपचं सरकार आलंय, मारवाडीत बोल! मराठी महिलेकडे हट्ट धरणाऱ्या दुकानदाराला मनसेकडून चोप
गृह विभागासाठी इतकी चढाओढ का?
शिवसेना गृह विभागासाठी अतिशय आग्रही आहे. सरकारमध्ये असताना देवेंद्र फडणवीस यांनी गृह मंत्रालय कायम आपल्याकडे राखलं आहे. २०१४ ते २०१९ या कालावधीत फडणवीस मुख्यमंत्री होते. तेव्हाही फडणवीस यांच्याकडेच गृह खात्याची धुरा होती. २०२२ मध्ये फडणवीस शिंदेंच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री झाले. त्यावेळीही त्यांनी गृहमंत्रिपद स्वत:कडे राखलं होतं. गृह मंत्रालय सांभाळणाऱ्या मंत्र्याकडे पोलीस प्रशासनाची सुत्रं असतात. पोलिसांची यंत्रणा संपूर्ण राज्यात कार्यरत असल्यानं सगळ्या भागातील खडानखडा माहिती गृहमंत्र्यांना असते.

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

bjpDevendra FadnavisMaharashtra politicsshiv senaएकनाथ शिंदेगृह मंत्रालयदेवेंद्र फडणवीसभाजपमहाराष्ट्र राजकीय बातम्याशिवसेना
Comments (0)
Add Comment