…तर आमच्या १०० जागा आल्या असत्या! शिवसेनेनं डिवचलं; जुलाबराव होऊ नका! NCPकडून प्रत्युत्तर

Shiv Sena vs NCP: विधानसभा निवडणुकीत तब्बल २३४ जागा जिंकणाऱ्या महायुतीला अद्याप सत्ता स्थापनेचा पेच सोडवता आलेला नाही. खातेवाटपाचा तिढा कायम असताना आता महायुतीच्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध सुरु झालं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: विधानसभा निवडणुकीत तब्बल २३४ जागा जिंकणाऱ्या महायुतीला अद्याप सत्ता स्थापनेचा पेच सोडवता आलेला नाही. खातेवाटपाचा तिढा कायम असताना आता महायुतीच्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध सुरु झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमुळे आमची बार्गेनिंग पॉवर घटल्याचं शिवसेना नेते रामदास कदम म्हणाले होते. यानंतर आता गुलाबराव पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला डिवचलं आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून लगेचच प्रत्युत्तर मिळालं आहे.

जे तुम्हाला अडीच वर्षांत जमलं नाही ते आमच्या शिंदे साहेबांनी करुन दाखवलं, अशा शब्दांत माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. ‘एकनाथ शिंदे लाडक्या बहिणांचे लाडके भाऊ झाले. शेतकऱ्यांचे लाडके भाऊ झाले. तरुणांचा मित्र झाले. मायबहिणींचे आशीर्वाद घेऊन हा माणूस लढतोय. शिंदे साहेबांवर टीका करणं योग्य नाही, असं पाटील म्हणाले.
Rohit Pawar: शरद पवारांकडून रोहित पाटलांवर मोठी जबाबदारी; आबांच्या लेकाच्या नावावर मोठा विक्रम
‘आम्ही विधानसभा निवडणुकीत केवळ ८५ जागा लढलो. कदाचित अजितदादा मध्ये आले नसते, तर त्या जागा आमच्या वाट्याला आल्या असत्या, तर आज तुम्हाला शिवसेनेच्या ९० ते १०० जागा दिसल्या असत्या. भाजपनं अजितदादांना सोबत घेतलं. त्यावेळी आमच्या नेत्यांनी तुम्ही यांना सोबत का घेतलं, असा प्रश्न विचारला नाही,’ असं गुलाबराव यांनी म्हटलं.

गुलाबराव पाटील यांच्या टिकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी प्रत्युत्तर दिलं. ‘महायुती म्हणून एकत्र लढलो आहोत तर आता तिघांनी एकत्र राहिलं पाहिजे. विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी अजित दादांनी मेहनत घेतली. पण आम्ही तिन्ही पक्षांची मेहनत नाकारत नाही. शिंदे साहेबांची मेहनतही आहे. आम्ही नाकारत नाही. फडणवीसांची मेहनतदेखील आम्ही नाकारत नाही,’ असं मिटकरी म्हणाले.
Eknath Shinde: शिवसेनेला हवा नैसर्गिक न्याय! फडणवीस पॅटर्नची मागणी; भाजपच्या त्यागाला लहान भावाकडून काऊंटर
‘तिघांनी मिळून महायुतीची सत्ता आणल्यानंतर महायुतीमधील रामदास कदम, गुलाबराव पाटील हे नेते अजित पवारांना जाणीवपूर्वक लक्ष्य करत आहे. गुलाबराव यांनी त्यांच्या नावाप्रमाणेच राहावं. त्यांचा सुगंध कमी झालेला दिसत आहे. गुलाबराव यांनी गुलाबराव राहावं. जुलाबराव होऊ नये, असा टोला मिटकरींनी लगावला.

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

bjpEknath ShindeMaharashtra politicsncpअजित पवारअमोल मिटकरीगुलाबराव पाटीलरामदास कदमराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेना
Comments (0)
Add Comment