लातूर जिल्हा हा सोयाबीन उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र मागील तीन वर्षापासून सोयाबीनला भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. केंद्र सरकारने 4 हजार 892 रुपयांचा हमीभाव जाहीर करूनही व्यापाऱ्यांकडून…सोयाबीन या भावाने खरेदी केले जात नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.एकरी सरासरी सोयाबीनचा खर्च हा 25 ते 30 हजार रुपयांच्या घरात जातो.मात्र याचे उत्पादन 35 हजार होते, यामुळे शेतकऱ्यांना आता आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही.अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. महायुती सरकारने सोयाबीनला सहा हजार रुपये…प्रति क्विंटल भाव देण्याचे आश्वासन दिले होते, एवढे तरी आश्वासन पाळावे, असं शेतकरी म्हणाले. संतप्त शेतकऱ्यांशी बातचित केलीये आमचे प्रतिनिधी ऋषिकेश होळीकर यांनी…