Mahabharata Story: महाभारतातील असे ५ शाप, जे आजही आपण भोगतो आहोत !

The curse in Mahabharata: अनेक शापांचं वर्णन महाभारतात आहे आणि त्या प्रत्येक शापामागे काही कारणं आहेत. ये लेखात आपण अशा काही शापांची माहिती घेणार आहोत ज्यांचा प्रभाव आजही आपल्यावर आहे किंवा त्या शापांचा त्रास आजही आपण भोगतो आहोत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Mahabharata Story: महाभारतातील असे ५ शाप, जे आजही आपण भोगतो आहोत !

The curse in Mahabharata in marathi: महाभारतात असे काही शाप सांगितले आहेत ज्याचा प्रभाव आजही आपल्यावर आहे. या शापामुळे आपण कलियुगातील परीणाम भोगतो आहोत. ते शाप कोणते आहेत ते सविस्तरपणे जाणून घेऊया.

युधिष्ठिराने सर्व स्त्री जातीला दिलेला शाप

महाभारतातील युद्धात जेव्हा अर्जुनाने महारथी कर्णाचा वध केला त्यावेळी माता कुंती कर्णाच्या पार्थिवाजवळ बसून विलाप करु लागली. आपली माता कर्णाच्या मृत्यूमुळे एवढी दुःखी का आहे? हे पांडवांना समजलेच नाही. तेव्हा धर्मराज युधिष्ठिराने माता कुंतीला विचारले, ‘आपल्या शत्रूचा मृत्यू झालाय यासाठी माते तुम्ही विलाप का करत आहात?’ तेव्हा माता कुंतीने पांडवांना जाऊन कर्णाच्या जन्माचे रहस्य सांगितले तसेच ‘तो तुमचा मोठा भाऊ होता’ असेही कुंती म्हणाली. जेव्हा पांडवांना ही गोष्ट कळली ते फार दुःखी झाले. धर्मराज मातेला म्हणाला, ‘माता तुम्हाला माहित होतं कर्ण आमचा मोठा भाऊ आहे मग तुम्ही हे आमच्यापासून का लपवून ठेवलं. तुम्ही मौन पाळलं पण यामुळे आम्ही आमच्या भावाचे मारेकरी झालो. म्हणून या कुरक्षेत्रावर उभा राहून धरती आकाश आणि दिशांना साक्षी मानत सर्व स्त्री जातीला असा शाप देतो की जगातील कोणतीच स्त्री महत्वाची गोष्ट कधीच गोपनीय म्हणजे लपवून ठेवू शकणार नाही.’

शृंगी ऋषींनी परीक्षित राजाला दिलेला शाप

दुसरा शाप आहे शृंगी ऋषींनी परीक्षित राजाला दिलेला. असे म्हणतात पांडवांनी ३६ वर्षे हस्तिनापुरावर राज्य केले. जेव्हा पांडव आपल्या शेवटच्या स्वर्गारोहण यात्रेला निघाले तेव्हा त्यांनी आपल्या सर्व राज्याची धुरा अभिमन्यूचा पुत्र परीक्षित यांच्याकडे दिली. राजा परीक्षितच्या अधिपत्याखाली सर्व प्रजा सुखाने नांदत होती. एके दिवशी परीक्षित राजा जंगलात गेला असताना त्याला तिथे शमिक नावाचे ऋषी दिसले जे त्यांच्या तपश्चर्येत मग्न होते आणि मौन व्रतात होते. त्यांच्याशी अनेकवेळा बोलण्याचा प्रयत्न करून देखील त्यांनी त्यांचे मौनव्रत सोडलं नाही, तेव्हा परीक्षित राजाने रागाने त्यांच्या गळ्यात एक मेलेला साप टाकला. जेव्हा ही गोष्ट ऋषी शृंगी (शमीक ऋषींचे पुत्र) यांना समजली तेव्हा क्रोधीत होत त्यांनी राजा परीक्षितला शाप दिला, ‘सात दिवसांत ‘तक्षक’ नागाच्या दंशाने त्याचा मृत्यू होईल.’ राजा परीक्षिताच्या मृत्यूनंतर कलियुगाची सुरुवात झाली. कारण परीक्षित जिवंत असेपर्यंत कलियुगात एवढे साहस नव्हते की तो कोणावरही हावी होऊ शकेल. या शापामुळेच आपण कलियुगाचे परीणाम आपण भोगत आहोत.

भगवान श्रीकृष्णाने अश्वत्थामाला दिलेला शाप

तिसरा शाप भगवान श्रीकृष्णाने अश्वत्थामाला दिला. महाभारताच्या युद्धसमाप्तीनंतर चिडलेल्या अश्वत्थामाने झोपलेल्या पांडवपुत्रांना मारून टाकलं. हे समजल्यावर पांडवांनी त्याचा पाठलाग केला. त्यावेळी श्रीकृष्ण त्यांच्यासोबत होता.महर्षी वेद व्यासांच्या आश्रमामागे अश्वत्थामा लपून बसला होता. त्याने अर्जुनाला पाहताच ब्रम्हास्त्र सोडले, ते पाहून लगेचच अर्जुनाने देखील ब्रम्हास्त्र सोडले. महर्षी व्यासांनी दोन्ही ब्रम्हास्त्र एकमेकांना धडकण्यापासून थांबवली आणि दोघांना आपापले ब्रम्हास्त्र परत घेण्यास सांगितलं. अर्जुनाने त्याचे ब्रम्हास्त्र परत घेतले, परंतु अश्वत्थामाला ते अस्त्र परत घ्यायची विद्या ठाऊक नव्हती. त्याने अस्त्राची दिशा बदलून ते अभिमन्यूची पत्नी उत्तरा हिच्या गर्भावर सोडले. अश्वत्थामाचे हे निंदनीय कृत्य पाहून श्रीकृष्णाने अतिशय क्रोधीत झाले. ‘त्यांनी त्याच्या मस्तकावरचा मणी काढून घेतला आणि त्याला भयंकर शाप दिला. त्याच्या डोक्याची जखम तशीच भळभळत राहील तू पृथ्वीतलावर भटकत राहशील. तूला कोणाशी बोलता येणार नाही. तुझ्या जखमेच्या दुर्गंधीमुळे कोणताही मनुष्य तुझ्या जवळ येणार नाही, दुर्गम जंगलातच तू राहशील.’ असं म्हणतात आजही अश्वत्थामा तेल मागतो आहे आणि पृथ्वीतलावर भटकत आहे.

मांडव्य ऋषींनी यमराजाला दिलेला शाप

चौथा शाप आहे जो मांडव्य ऋषींनी यमराजाला दिला. एकदा एका राजाने न्यायदानात चुक केली आणि त्यांना सुळीवर चढवण्याचे आदेश दिले, परंतु खूप वेळ सुळीवर चढवून देखील त्यांचे प्राण गेले नाहीत. तेव्हा राजाला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्याने ऋषींना सुळीवरून खाली उतरवून आपल्या चुकीची क्षमा मागितली. त्यानंतर मांडव्य ऋषी यमराजकडे गेले आणि त्यांनी यमाला विचारलं, ‘मला कोणत्या गोष्टीची शिक्षा मिळाली?’ त्यावर यमराज म्हणाले, ‘तुम्ही बारा वर्षांचे होते तेव्हा एक छोट्याश्या किड्याच्या शेपटीमध्ये सुई घुसवली होती याच कारणामुळे त्यांना ही शिक्षा मिळाली.’ त्यावर मांडव्य ऋषी म्हणाले, ‘बारा वर्षाच्या वयात कोणालाच धर्म-अधर्म या गोष्टींची जाण नसते पण तू खूप लहान गोष्टीसाठी मला शिक्षा दिलीस म्हणून मी तुला शाप देतो की तुला शूद्र योनीत दासीच्या पोटी जन्म घ्यावा लागेल आणि म्हणूनच महाभारतात यमराजाला ‘विदुराच्या’ रूपात जन्म घ्यावा लागला.’

उर्वशीने अर्जुनाला दिलेला शाप

जेव्हा अर्जुन दिव्य अस्त्राच्या प्राप्तीसाठी स्वर्गलोकी गेला होता तेव्हा उर्वशी नावाची अप्सरा अर्जुनाकडे आकर्षित झाली होती. ही गोष्ट जेव्हा तिने अर्जुनाला सांगितली तेव्हा अर्जुनाने नम्रपणे तिला सांगितले, ‘तुम्ही मला माते समान आहात.’ हे ऐकून उर्वशी अतिशय क्रोधीत झाली आणि अर्जुनाला म्हणाली, ‘नपुंसक माणसारख्या अर्जुना मी तुला शाप देते की तू खरंच नपुंसक होऊन स्त्रियांमध्ये नर्तक बनून राहशील.’ हा शाप ऐकून अर्जुन भयभीत झाला आणि त्याने सगळी गोष्ट इंद्रदेवाला सांगितली. इंद्रदेवाच्या सांगण्यावरून उर्वशीने शापाचा अवधी एक वर्षाचा केला. तेव्हा राजा इंद्राने त्याला दिलासा देत सांगितलं, ‘हाच शाप तुझ्यासाठी एक वर्षाच्या अज्ञातवासात वरदान ठरेल. अज्ञातवासात असताना नर्तिकेच्या वेशामुळे कौरवांपासून तू सुरक्षित राहशील.’ असे हे महाभारतातील काही शाप ज्याची प्रचीती आपल्याला आजही येते.

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Mahabharata in marathiMahabharata StoryThe curse in Mahabharataआजही भोगतो आहोत महाभारतातील शापमहाभारतातील शाप
Comments (0)
Add Comment