अजित पवारच सुपारीबाज, हत्येचा खटला भरा; जय मालोकारच्या मृत्यू प्रकरणावरुन प्रकाश महाजन चिडले

छत्रपती संभाजीनगर : अकोल्यात राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांची गाडीवर मनसैनिकांनी फोडली. राष्ट्रवादी-मनसे कार्यकर्त्यांच्या हमरीतुमरीनंतर अस्वस्थ वाटत असल्याने मनसैनिक जय मालोकार यांना रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु त्यांचा मृत्यू झाला. या घटनेवरुन मनसे नेते प्रकाश महाजन आक्रमक झाले आहेत. अजित पवार सुपारीबाज नेते असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी महाजनांनी केली. यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना राग आला, तर माझ्याकडे गाडी नाहीये, पण माझी स्कूटर फोडा, अशा शब्दात त्यांनी चॅलेंजही दिलं.

प्रकाश महाजन काय म्हणाले?

जय मालोकार नावाच्या आमच्या तरुण कार्यकर्त्याचा मृत्यू झाला, त्याच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. पक्ष आणि पक्षाचे नेते त्याच्या परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. पुण्याच्या पूरपरिस्थितीवर राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं होतं. त्यावर अमोल मिटकरी यांनी सरळसरळ राज ठाकरे यांना सुपारीबाज नेता म्हटलं. ते एका वैधानिक पदावर आहेत, त्यांच्याकडे असा कुठला पुरावा आहे? ते त्यांनी सांगावं. बेछूट आरोप करणं ही मिटकरींची सवय, याआधी त्यांनी भाजप नेत्यांवर आरोप केले आहेत. राष्ट्रवादी अखंडित असताना ब्राह्मण समाजाविषयी अत्यंत घाणेरडे अनुद्गार काढले आहेत, याकडे प्रकाश महाजन यांनी लक्ष वेधलं

राज ठाकरेंवर टीका केल्याच्या रागातून कार्यकर्ते जाब विचारायला गेले असता झालेल्या बाचाबाचीचं पर्यवसन मिटकरींच्या गाडीवर दगडफेक करण्यात झालं. त्याचं समर्थन कुणी करत नाही, पण याचा तणाव येऊन आमच्या तरुण कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. कारण मिटकरी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये बसले होते, आणि कारवाई करा म्हणून ठिय्या मांडला होता. माझं उलट म्हणणं आहे की अमोल मिटकरी, त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील आणि पक्षाचे सर्वोच्च नेते अजित पवार यांच्यावर महाराष्ट्र सरकारने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्वरित दाखल करावा, अशी मागणी प्रकाश महाजन यांनी केली.
Sandeep Deshpande : आमचा २८ वर्षांचा मनसैनिक गेलाय, मिटकरींनी नीच राजकारण करु नये, संदीप देशपांडेंचा इशारा
शब्दाची निवड महत्त्वाची आहे. राज ठाकरेंना सुपारीबाज म्हणायला काय पुरावा आहे? सुपारीबाज तर अजित पवार आहेत. जरंडेश्वर कारखाना त्यांनी कसा हडपला, एकत्र पवार कुटुंब असताना कन्नडचा कारखाना त्यांनी कसा हडपला? खुद्द पंतप्रधानांनी ७० हजार कोटींचा घोटाळा राज्य सहकारी बँकेत झाल्याचं सांगितलं, पण आम्ही असे मर्यादा सोडून आरोप कधी केले का? मनसेच्या वैभव खेडेकरांचा सुनील तटकरेंच्या प्रचाराला विरोध होता, पण तरी तुम्ही खेडेकरांना तयार करा, म्हणून राज ठाकरेंपाशी जाऊन बसलात. मनसेने मनापासून प्रचार केला नसता, तर रायगडचं चित्र वेगळं दिसलं असतं. तेव्हा राज ठाकरे सुपारीबाज वाटले नाहीत का? तेव्हा तुमचा फायदा होता, असा प्रतिप्रश्नही प्रकाश महाजन यांनी विचारला.
Dhairyasheel Mane : लोकसभेत शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेतेपदी युवा चेहरा, एकनाथ शिंदेंकडून कोणाला मान?
यांची साधी गाडी फुटली, तर उमेश पाटील म्हणतात राज ठाकरेंवर खटला भरा, अटक करा. मग एकाचा मृत्यू झाला, त्याला कोणाला जबाबदार धरायला पाहिजे? म्हणून मी अजित पवारांना सुपारीबाज बोललो, माझी गाडी फोडायची तर फोडा, पण मी गाडीच ठेवत नाही, स्कूटर वापरतो, ती फोडायची तर फोडा, दगड मारुन तर बघा. आम्ही मोदी पंतप्रधान व्हावे म्हणून पाठिंबा दिला, पण आता अजित पवारांनाच महायुतीत राहायचं नाही, म्हणून काहीतरी करुन भांडण काढत आहेत, असंही ते म्हणाले.

Source link

ajit pawarAkola newsAmol MitkariJay Malokar Death Caseअमोल मिटकरी गाडी तोडफोडजय मालोकारप्रकाश महाजनराज ठाकरे
Comments (0)
Add Comment