‘बुंधा चोरून नेलेले चंदनाचे झाड सुमारे १८ वर्षांपूर्वी दोन वेळा कापण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर त्या झाडाला मजबूत असा सहा फुटी उंच चौथरा बांधून घेण्यात आला होता. त्यावर पाच फूट लोखंडी ग्रील करून घेतले होते,’ अशी माहिती अॅड. रोहित एरंडे यांनी दिली.
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
जुलै महिन्याच्या सुरुवातीला याच परिसरातील भावे रस्त्यावर एका बंगल्यात सराइत चोरट्याने चोरी करून सुमारे १४ लाख रुपये किमतीचे दागिने लंपास केले होते. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आठवड्याभरातच चोरट्याला मुद्देमालासहीत पकडले. मात्र, ही घरफोडीची घटना आणि नुकत्याच घडलेल्या चंदन चोरीची घटनेमुळे येथील बंगल्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
‘पोलिस गस्त वाढवा’
भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता आणि कर्वे रस्ता या परिसरात जुने बंगल्यांचे अस्तित्व आजही टिकून आहेत. येथील रस्ते अरुंद असून मुख्य रस्त्यांच्या तुलनेने वर्दळ खूपच कमी असते. रात्रीच्या वेळेला अंधाराचे साम्राज्य असते. त्यामुळे या रस्त्यावर पुरेशी प्रकाश व्यवस्था असावी; तसेच रात्रीच्या वेळेला पोलिस गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.
पोलिस १५-२० मिनिटांनी दाखल
सोसायटीच्या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूकडून कोणी येऊ नये म्हणून आरोपींनी दुचाकी रस्त्याला आडव्या लावून ठेवल्या होत्या. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांच्या ११२ नंबरला फोन लावला. सुमारे १५ ते २० मिनिटांनी पोलिस बिट मार्शल घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत चोरटे झाड घेऊन गेले होते. आवाजामुळे आजूबाजूचे लोक जागे झाले; परंतु हत्यारबंद आरोपी पाहिल्यानंतर त्यांनी तक्रारदाराला फोन करून बाहेर येऊ नका, असे बजावले होते.