उल्हासनगरमध्ये आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश
उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आंतरराष्ट्रीय टोळीच्या माध्यमातून अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या एनसीबी अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. या टोळीकडून ७५ किलो गांजा आणि ४८ हजार कोडिन बॉटल अशा एकूण पावणे दोन कोटी रुपयांच्या अमली पदार्थांच्या तस्करीचा साठा जप्त केला आहे. विशेष म्हणजे या टोळीतील तस्करांनी कुरियरद्वारे अमली पदार्थ मागवले होते.
काय आहे प्रकरण?
उल्हासनगर मधील एका कुरिअरच्या कार्यालयाबाहेर अधिकाऱ्यांनी सापळा रचून ही कारवाई केली. कुरियरद्वारे मागवलेले अमली पदार्थ घेण्यासाठी एक व्यक्ती आला. तो पार्सल घेण्यासाठी आला आणि त्याने पार्सल हातात घेतलं. त्या व्यक्तीने ते पार्सल हातात घेतल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. त्याने चौकशीत टोळीतील इतरांची माहिती दिली. त्याने दिलेल्या माहितीनंतर इतर पाच जणांना भिवंडीतील एका चौकामध्ये कारमध्ये बसलेले असताना त्यांच्या मुसक्या आवळत पकडले आहे. त्यांच्याजवळ १ लाख १८ हजार ८८० रुपये रोख रक्कम आढळली आहे.