विधानसभेला तिकीट कोणाला? भाजपाच फॉर्म्युला ठरला, लोकसभेतून धडा; बऱ्याच आमदारांना नारळ?

मुंबई: लोकसभा निवडणुकीत झालेल्या सुमार कामगिरीनंतर आता भारतीय जनता पक्षानं विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. सत्तेत कायम राहण्यासाठी भाजपनं व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी बैठकांचा सिलसिला सुरु आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवार निवडताना झालेल्या चुकांचा फटका भाजपला बसला आहे. त्या चुकांमधून धडे घेत भाजपनं विधानसभेसाठी उमेदवार निवडताना सूत्र निश्चित केलं आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपनं बऱ्याचशा विद्यमान खासदारांना पुन्हा संधी दिली. त्यातील केवळ २ उमेदवार निवडून आले. भाजपचे बाकीचे निवडून आलेले ७ खासदार नवे आहेत. लोकसभेतून चुकांमधून बोध घेत भाजपनं विधानसभेसाठी उमेदवारांची निवड करताना एक फॉर्म्युला ठरवला आहे. ज्या आमदारांविरोधात जनतेमधून अँटी इन्कम्बन्सीचा सूर असेल त्यांचं तिकीट कापण्यात येईल. पक्षाकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघासमोर हीच भूमिका मांडली आहे.
Maharashtra Politics: महिनाअखेरीस भाजप मोठा धमाका करण्याच्या तयारीत; विधानसभेसाठी डाव टाकणार, दिल्लीत प्लान तयार
गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात होते. त्यावेळी त्यांनी संघ परिवारातील विविध संघटनांच्या समन्वय बैठकीला हजेरी लावली. या बैठकीत फडणवीसांनी लोकसभेतील पराभवाचं विश्लेषण केलं. विधानसभा निवडणुकीतील नियोजनाबद्दल त्यांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांना माहिती आहे. अनेक खासदारांविरोधात लोकांच्या मनांमध्ये रोष होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष करुन काही जणांना तिकिटं देण्यात आली. त्याचा फटका बसला, असं फडणवीसांनी या बैठकीत सांगितल्याची माहिती सुत्रांनी दिली.
Maharashtra Politics: भाजपच्या ८० ते ९० जागा येतील! सर्व्हेतील ‘जर-तर’मुळे कोंडी; विचित्र पेचानं मिशन अवघड?
निवडणुकीच्या राजकारणात पक्षासोबतच उमेदवाराची जनमानसातील प्रतिमा महत्त्वाची असते. प्रचारात कितीही राष्ट्रीय, प्रादेशिक विषय असले तरीही स्थानिक मुद्दे निकाल बदलू शकतात. लोकसभेला ही बाब दिसून आली. मराठवाड्यात मराठा आरक्षण, उत्तर महाराष्ट्रात कांदा प्रश्न भाजपसह महायुतीला महागात पडला. त्यामुळे आता भाजपनं सावध पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे.

बदललेल्या राजकारणात निवडणूक उमेदवाराच्या अवतीभोवतीच फिरते, असं फडणवीस म्हणाले होते. त्यातून त्यांनी उमेदवार निवडताना कोणत्या बाबींचा विचार होणार त्याचे संकेत दिले. ज्या आमदारांबद्दल जनतेच्या मनात नाराजी असेल त्यांचं तिकीट कापण्यात येण्याची दाट शक्यता आहे. भाजपनं नवे चेहरे दिल्यास त्यांना राज्यात ८० ते ९० जागा मिळतील, अशी माहिती नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातून समोर आली.

Source link

assembly electionsbjp maharashtrabjp masterplanDevendra FadnavisMaharashtra politicsदेवेंद्र फडणवीसभाजप महाराष्ट्रमहाराष्ट्र राजकीय बातम्याविधानसभेसाठी भाजप सज्जविधानसभेसाठी भाजपचा प्लान
Comments (0)
Add Comment