कसारा घाटात कंटेनरला भीषण अपघात, वाहन थेट दरीत; एका चिमुकल्यासह पाच जणांचा मृत्यू

नाशिक : नाशिकहून मुंबईच्या दिशेन येणाऱ्या एका कंटेनरला भीषण अपघात झाला असून पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. नवीन कसारा घाटातील बलगर पॉईंटजवळ कंटेनरला अपघात झाला आहे. पाच मृतांपैकी तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तीन बाहेर काढलेल्या मृतांमध्ये दोन तरुणांसह एका चिमुकल्याचाही मृत्यू झाला आहे.
Crime News : घरात घुसून अत्याचाराचा प्रयत्न, स्वरक्षणासाठी पीडितेकडून आरोपीच्या गुप्तांगावर हल्ला
कसारा घाटात अपघात झाल्यानंतर तात्काळ पोलीस तसंच आपत्ती व्यवस्थापन टीमने घटनास्थळी दाखल होत मदतकार्य सुरू केलं. यावेळी ९ वर्षांच्या चिमुकल्यासह २१ वर्षीय आणि ३० वर्षीय अशा दोन तरुणांचा मृत्यदेह बाहेर काढण्यात आला आहे.

नवीन कसारा घाटातील बलगर पॉईंटजवळ हा अपघात झाला. कसारा घाटात उतार असल्याने कंटेनर रस्त्यावर आल्यानंतर कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि कंटेनर बाजूच्या खोल दरीत कोसळला. यात कंटेनरमधील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पाच मृतांपैकी दोन जण मुंबईतील असल्याची माहिती आहे.

Source link

nashiknashik accident newsnashik kasara ghat accidentNashik newsकसारा घाटात अपघातनाशिक अपघातनाशिक कसारा घाट बलगर पॉईंट अपघातनाशिक कसारा घाटात कंटेनरचा अपघातनाशिक बातमी
Comments (0)
Add Comment