अक्षय महाराज भोसले यांची शरद पवारांवर सणसणीत टीका

Authored byअजित भाबड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 23 Aug 2024, 7:20 pm

sharad pawar : वारकरी संमेलनावरून शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले त्यांनी थेट शरद पवारांना लक्ष केलं आहे. खाऊन खाऊन भागले आणि पवार साहेब देवपूजेला लागले. असं म्हणत अक्षय महाराज भोसले यांनी शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
अभिजीत दराडे, पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार ) आध्यात्मिक व वारकरी आघाडी, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पहिल्या वारकरी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवारी होणाऱ्या या संमेलनात राज्यभरातून वारकरी सहभागी होणार आहेत. तर युगेंद्र पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या या संमेलनाला शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. स्वागताध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे असणार आहेत. या वारकरी संमेलनावरून शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले त्यांनी थेट शरद पवारांना लक्ष केलं आहे. खाऊन खाऊन भागले आणि पवार साहेब देवपूजेला लागले. असं म्हणत अक्षय महाराज भोसले यांनी शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे.
वारकरी संत साहित्याच्या मूल्यांवर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान आहे. त्यामुळे पवार साहेबांच्या पक्षाने वारकऱ्यांना काही सांगण्याची गरज नाही. आपल्या विचारांच्या एक पाऊल वारकरी पुढे आहे. वारकरी मेळावा रविवारी आहे. साहेबांच्या आगमनानंतर वारकऱ्यांनी प्रश्न करावा की, साहेब आज तरी आपण शाकाहारी आहार घेतला आहे का? कारण त्यांना मांसाहार करून मंदिरात जाण्याची सवय आहे. अशी घणाघाती टीका भोसले यांनी केली आहे.

तर, पवार साहेबांच्या गावावरून जाणाऱ्या पालखी सोहळा असताना देखील आजतागायत कधी ते तुकाराम महाराजांच्या पादुकांच्या दर्शना करता गेले नाहीत. पंढरपूरला मंदिरात गेल्यानंतर मंदिरात न जाता कट्ट्यावर गप्पा मारत बसणारे शरद पवार. आता वारकरी मेळावा घेऊन काय सांगणार ? आगामी निवडणुका डोळ्यापुढे ठेवून वारकऱ्यांची मेळावे घेण्याची सद्बुद्धी पवारांना लाभली. मात्र, भूतकाळात पवारांनी जाती जातीत भांडणे लावली आहे हे संपूर्ण राज्य जाणते. वारी काळात शिंदे सरकारने केलेल्या कामाची मनात कुठेतरी भीती वाटतं असणार. आयुष्याच्या सायंकाळी का होईना पवार साहेबांची पावले अध्यात्माकडे ‘हिंदुत्वाकडे’ वळत आहेत. अशी टीका भोसले यांनी केली आहे. अक्षय महाराज भोसले यांच्या टीकेनंतर आता राजकीय वातावरण पेटण्याचे चित्र आहे.

दरम्यान, 7 ते 8 महिन्यापूर्वी स्थापन झालेल्या राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीच्या स्थापनेनंतर हे पहिलेच अधिवेशन होतं आहे. वारकारी संप्रदयात काही अविचारी लोक घुसलेत पण संताचे विचार हे संविधानाची दुसरी बाजू आहे. त्यामुळे आम्ही पुरोगामी विचाराचे शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही आघाडी सुरु केली. अलीकडच्या काळात काही अविवेकी विचारांच्या मंडळींनी वारकरी संप्रदायिक घुसखोरी केली असल्याचे दिसून येत आहे. वारकरी संप्रदायाला जातीभेदाच्या चौकटीत बंदिस्त करण्याचा प्रयत्न काही मंडळी जाणीवपूर्वक करत आहेत. असं झालं तर यात वारकरी संप्रदायाचे आणि समाजाचे कधी न भरून येणार नुकसान होईल. हे नुकसान होऊ नये. त्यामुळेच ही आघाडी स्थापन केली असल्याचं राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

लेखकाबद्दलअजित भाबडअजित भाबड, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. अजित यांनी आबासाहेब गरवारे कॉलेजमधून पत्रकारितेची मास्टर्स पदवी मिळवली आहे. त्यांना राजकीय, सामाजिक, अंतरराष्ट्रीय तसेच कृषी क्षेत्रातील विश्लेषणात्मक बातम्या लिहिण्याची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

akshay maharaj bhosalePune newspune news updatesPune TOPICSharad Pawar newsSharad Pawar TOPICपुणे बातमीपुणे बातम्यावारकरी संमेलनशरद पवार
Comments (0)
Add Comment