
Tej Police Times
तर, पवार साहेबांच्या गावावरून जाणाऱ्या पालखी सोहळा असताना देखील आजतागायत कधी ते तुकाराम महाराजांच्या पादुकांच्या दर्शना करता गेले नाहीत. पंढरपूरला मंदिरात गेल्यानंतर मंदिरात न जाता कट्ट्यावर गप्पा मारत बसणारे शरद पवार. आता वारकरी मेळावा घेऊन काय सांगणार ? आगामी निवडणुका डोळ्यापुढे ठेवून वारकऱ्यांची मेळावे घेण्याची सद्बुद्धी पवारांना लाभली. मात्र, भूतकाळात पवारांनी जाती जातीत भांडणे लावली आहे हे संपूर्ण राज्य जाणते. वारी काळात शिंदे सरकारने केलेल्या कामाची मनात कुठेतरी भीती वाटतं असणार. आयुष्याच्या सायंकाळी का होईना पवार साहेबांची पावले अध्यात्माकडे ‘हिंदुत्वाकडे’ वळत आहेत. अशी टीका भोसले यांनी केली आहे. अक्षय महाराज भोसले यांच्या टीकेनंतर आता राजकीय वातावरण पेटण्याचे चित्र आहे.
दरम्यान, 7 ते 8 महिन्यापूर्वी स्थापन झालेल्या राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीच्या स्थापनेनंतर हे पहिलेच अधिवेशन होतं आहे. वारकारी संप्रदयात काही अविचारी लोक घुसलेत पण संताचे विचार हे संविधानाची दुसरी बाजू आहे. त्यामुळे आम्ही पुरोगामी विचाराचे शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही आघाडी सुरु केली. अलीकडच्या काळात काही अविवेकी विचारांच्या मंडळींनी वारकरी संप्रदायिक घुसखोरी केली असल्याचे दिसून येत आहे. वारकरी संप्रदायाला जातीभेदाच्या चौकटीत बंदिस्त करण्याचा प्रयत्न काही मंडळी जाणीवपूर्वक करत आहेत. असं झालं तर यात वारकरी संप्रदायाचे आणि समाजाचे कधी न भरून येणार नुकसान होईल. हे नुकसान होऊ नये. त्यामुळेच ही आघाडी स्थापन केली असल्याचं राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
लेखकाबद्दलअजित भाबडअजित भाबड, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. अजित यांनी आबासाहेब गरवारे कॉलेजमधून पत्रकारितेची मास्टर्स पदवी मिळवली आहे. त्यांना राजकीय, सामाजिक, अंतरराष्ट्रीय तसेच कृषी क्षेत्रातील विश्लेषणात्मक बातम्या लिहिण्याची आवड आहे…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.