आम्हीसुद्धा महायुतीत पण..; निवडणुकीआधीच कोकणात शिमगा; भाजपचे माजी आमदार उदय सामंतांवर नाराज

रत्नागिरी, प्रसाद रानडे : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे याच पार्श्वभूमीवर आता पालकमंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातच शिवसेना भाजपमध्ये खदखद असल्याचे समोर आले आहे. भाजपाचे माजी आमदार बाळा माने यांनी पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावरच केलेल्या टीकेमुळे रत्नागिरी येथील शिवसेना भाजप महायुतीमध्येच एक वाक्यता नसल्याचे आता समोर येत आहे. गावात भूसंपादनाच्या नोटीस आल्यानंतरच कळलं की मिऱ्या येथे एमआयडीसी प्रस्तावित आहे. उद्योग मंत्री आदरणीय उदय सामंत यांच्या माध्यमातून मिऱ्या बंदराचा फार मोठा विकास होणार आहे. अशी शाब्दिक टोलेबाजी करत माजी आमदार भाजपाचे नेते बाळासाहेब माने यांनी नाराजी व्यक्त केली.
याच संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून कळवले असून याच प्रस्तावित एमआयडीसी बाबत आम्हाला कोणाला काहीच माहिती नाही अशा स्वरूपाची भूमिका बाळासाहेब माने यांनी मांडली आहे. इतकंच नाही तर याच संदर्भात उद्योगमंत्र्यांचा हेतू चांगला नाही असंही खळबळजनक विधान केल्याने महायुती मधील खदखद समोर आल्याचे कळते. आता उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातच शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.
तुमची ती प्रतिमा या प्रकरणात उद्ध्वस्त होईल… अभिनेते किरण माने यांचं शरद पवारांना खुलं पत्र

बाळू माने पुढे म्हणाले की, मित्र पक्ष सरकार म्हणून सगळं करण्यापूर्वी चर्चा करते, पण उदय सामंत यांनी प्रयत्न केलेत असं मला वाटत नाही आणि म्हणूनच आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी पत्र लिहिले आहे अशी ही माहिती बाळ माने यांनी दिली.याच संदर्भात आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र लिहून बैठक लावण्याची मागणी केली आहे आम्हाला नेमकं काय आहे ते समजून सांगा आणि विकास जर करायचा असेल त्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतोच आहोत. अशा स्वरूपाचे पत्र आपण देवेंद्रजींना लिहिल आहे अशी ही माहिती माजी आमदार बाळ माने यांनी दिली आहे.
Devendra Fadnavis: राज्याचे ‘डायनॅमिक मॉडेल’ आता देशभरात; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

महायुतीचे सरकार आहे आम्ही महायुतीमध्ये आहोत, त्यामुळे स्थानिक लोक आम्हाला विचारतात की आम्हाला परस्पर नोटीसा कशा येतात ? पर्यटन विकास सागरी महामार्ग हे आम्हाला हवेच त्यातून गाव विकसित होणार आहेत, पण त्याच्याकरिता एमआयडीसीचे भूसंपादन कशासाठी असा खडा सवाल बाळ माने यांनी उपस्थित केला आहे. याच ठिकाणी जंगल सफारी पर्यटन हॉटेल उद्योग चांगल्या प्रकारे होऊ शकतात आम्ही जमीन मालकांबरोबर चर्चा करू त्यासाठी भूसंपादनाची आवश्यकता नाही त्यामुळे हा सगळा बागुलबुवा आहे असाही आरोप माने यांनी केला आहे.

मिऱ्या येथील लोक आपल्या पायाशी यावेत मग आपण भूसंपादन रद्द करू अशा प्रकारचं काम चालू आहे असा आरोप करत आणि हेच वाटद येथे घडल आहे. वाटद येथेही भूसंपादनासाठी नोटिसा गेले होत्या भूसंपादन प्रक्रिया सुरू होती मग दोन वर्षे झाली हे उद्योग मंत्री आहेत असाही टोला बाळ माने यांनी लगावला आहे. रत्नागिरी जवळ मिऱ्या येथे प्रस्तावित एमआयडीसीला भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब माने यांनी विरोध दर्शवला आहे त्यामुळे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या जिल्ह्यातच महायुतीमध्ये मिऱ्या येथे प्रस्तावित एमआयडीसीच्या मुद्द्यावरून वाद होण्याची चिन्हे आहेत

Source link

ex mla balasaheb mane bjpminister uday samantratnagiri mirya midc projectउदय सामंतबाळासाहेब मानेभाजपमहायुतीमिऱ्या एमआयडीसी
Comments (0)
Add Comment