
Tej Police Times
महायुतीचे सरकार आहे आम्ही महायुतीमध्ये आहोत, त्यामुळे स्थानिक लोक आम्हाला विचारतात की आम्हाला परस्पर नोटीसा कशा येतात ? पर्यटन विकास सागरी महामार्ग हे आम्हाला हवेच त्यातून गाव विकसित होणार आहेत, पण त्याच्याकरिता एमआयडीसीचे भूसंपादन कशासाठी असा खडा सवाल बाळ माने यांनी उपस्थित केला आहे. याच ठिकाणी जंगल सफारी पर्यटन हॉटेल उद्योग चांगल्या प्रकारे होऊ शकतात आम्ही जमीन मालकांबरोबर चर्चा करू त्यासाठी भूसंपादनाची आवश्यकता नाही त्यामुळे हा सगळा बागुलबुवा आहे असाही आरोप माने यांनी केला आहे.
मिऱ्या येथील लोक आपल्या पायाशी यावेत मग आपण भूसंपादन रद्द करू अशा प्रकारचं काम चालू आहे असा आरोप करत आणि हेच वाटद येथे घडल आहे. वाटद येथेही भूसंपादनासाठी नोटिसा गेले होत्या भूसंपादन प्रक्रिया सुरू होती मग दोन वर्षे झाली हे उद्योग मंत्री आहेत असाही टोला बाळ माने यांनी लगावला आहे. रत्नागिरी जवळ मिऱ्या येथे प्रस्तावित एमआयडीसीला भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब माने यांनी विरोध दर्शवला आहे त्यामुळे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या जिल्ह्यातच महायुतीमध्ये मिऱ्या येथे प्रस्तावित एमआयडीसीच्या मुद्द्यावरून वाद होण्याची चिन्हे आहेत
Recover your password.
A password will be e-mailed to you.