रविंद्र चव्हाणांनी फासे टाकले, कोकणातील मतदार महायुतीकडे वळले; नव्या नेतृत्वामुळे राणे कुटुंबासाठी धोक्याची घंटा?

Ravindra Chavan Emerge as Frontline Leader in Konkan : महायुतीने कोकणपट्ट्यात ३९ पैकी ३५ जागा जिंकून कोकणातला विजयाचा स्ट्राईक रेट ९० टक्क्यांवर पोहोचवला आहे. त्याचे श्रेय प्रामुख्याने भाजपा नेते आमदार रविंद्र चव्हाण यांना दिले जात आहे.

Lipi

प्रसाद रानडे, रत्नागिरी : महायुतीने कोकणपट्ट्यात ३९ पैकी ३५ जागा जिंकून कोकणातला विजयाचा स्ट्राईक रेट ९० टक्क्यांवर पोहोचवला आहे. त्याचे श्रेय प्रामुख्याने भाजपा नेते आमदार रविंद्र चव्हाण यांना दिले जात आहे. मुंबई महानगर प्रदेश व कोकणासह पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा रवींद्र चव्हाण यांनी राजकारणातील फासे टाकले. मात्र याच वेळी भाजपाचे कोकणातील ज्येष्ठ नेते विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या बरोबरीने आता रविंद्र चव्हाण यांचे नेतृत्व कोकणासाठी प्रोजेक्ट करण्यात येत असल्याचे चित्र आहे.

सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करणाऱ्या डोंबिवलीसारख्या मोठ्या शहराचे रा. स्व. संघ आणि भाजपच्या विचारधारेशी अतूट नाते असलेले रविंद्र चव्हाण प्रतिनिधित्व करतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी नाते आणि संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज ही चव्हाण यांची खासियत आहे. त्यामुळे एकाच वेळेस संघाची वैचारिक बैठक आणि संघटनेच्या ताकदीवर लढणाऱ्या नेत्यामुळे महायुतीला यश मिळाले आहे. लोकसभा निवडणूकीचा अपवाद वगळता विधानसभा निवडणूक असो किंवा मग विधान परिषदेची पदवीधर मतदारसंघाची निवडणूक, गेल्या काही महिन्यांत महायुतीला यश मिळत आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपची निवडणूक प्रचार यंत्रणा प्रमुखपदाची जबाबदारी रविंद्र चव्हाणांवर होती.
महाराष्ट्राला ५ डिसेंबर रोजी मिळणार नवे सरकार; आझाद मैदानावर PM मोदींच्या उपस्थितीत होणार शपथविधी सोहळा
विधानसभा निवडणूक प्रचाराच्या काळात रविंद्र चव्हाण यांनी कधी पालघर, तर कधी रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा महत्वाच्या मतदारसंघात संघटनात्म पातळीवर काम केले. तसेच कार्यकर्त्यांच्या बैठका घेत प्रचाराचे सूक्ष्म नियोजनही केले. त्यामुळेच या विधानसभा निवडणुकीत कोकणातील ३९ जागांपैकी ३५ जागांवर भाजप-महायुतीचा विजय झाला. विशेष म्हणजे पालघर जिल्ह्यात हितेंद्र ठाकूर यांच्या बविआ पक्षाला मात देत ६ पैकी ५ जागांवर महायुतीने विजयाचा ध्वज फडकावला.

रविंद्र चव्हाण यांच्यामुळेच कोकण तसेच पालघर भागातील जनतेने महायुतीला कौल दिला, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. परिणामी कार्यकर्त्यांमध्ये आणि रविंद्र चव्हाण समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. कोकणात आता नारायण राणे यांच्याबरोबर रविंद्र चव्हाण यांचे हे नेतृत्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून प्रोजेक्ट होत असल्याने हा इशारा नेमका कोणासाठी याच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत.

विमल पाटील

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

konkan bjp leadersmaharashtra assembly resultmahayuti big winNarayan Raneravindra chavanकोकणातील महायुतीचे बडे नेतेनारायण राणेंची ताकदमहायुतीचा मोठा विजयमहाराष्ट्र निवडणूक निकालरविंद्र चव्हाण मोठे नेते
Comments (0)
Add Comment