नागपुरात मिरचीच्या गोदामाला आग; पाच हजार पोती, १७ कोटींची मिरची जळून खाक

Authored by Karishma Bhurke | Maharashtra Times | Updated: 23 Nov 2022, 6:03 pm

Nagpur News: पियूष पाटील : कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामाला मंगळवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत अंदाजे १७ कोटींची मिरची जळून खाक झाली असल्याची माहिती आहे. काही तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. मिरचीला लागलेल्या आगीने निर्माण झालेल्या धुरामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती आहे.

 

Source link

17 lakhs of rupees chili burnednagpur kalmana apmc marketNagpur newsnagpur news fire at kalmana apmc marketनागपूरनागपूर एपीएमसीनागपूर एपीएमसी आगनागपूर मिरची जळून खाक
Comments (0)
Add Comment