फेब्रुवारीत सरकार पाडण्यासाठी संजय राऊतांनी काय नियोजन केलंय, हे त्यांनाच विचारतो: पवार

Sharad Pawar press conference in Kolhapur | आगामी काळात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणुका लढवण्यात काही अडचण येईल, असे वाटत नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.शरद पवारांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका. आम्ही राज्यपालांवर नाखूश आहोत. महाराष्ट्रात आज उत्तम दर्जाच्या राज्यपालांची परंपरा होती. सर्व राज्यपालांनी ती परंपरा जपली होती.पण सध्याचे राज्यपाल सतत वादग्रस्त वक्तव्यं करतात.

 

शरद पवारांची कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद

हायलाइट्स:

  • संजय राऊत आणि नारायण राणे यांच्यात शाब्दिक वाद
  • फेब्रुवारीत सरकार कोसळणार असल्याचा राऊतांचा दावा
  • शरद पवार मुंबईत येऊन संजय राऊतांशी बोलणार
कोल्हापूर: सत्ता हातात असताना जमिनीवर पाय जमिनीवर ठेवायचे असतात. पण सध्याच्या राज्यकर्त्यांकडून ते होताना दिसत नाही. त्यांच्याकडून इतरांना तुरुंगात डांबण्याची भाषा केली जात आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले. ते रविवारी कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यामध्ये सध्या शाब्दिक वाद सुरु आहे. नारायण राणे यांनी संजय राऊत यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्याचा इशारा दिला होता. त्यावर संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली होती. नारायण राणे तुम्ही माझ्या नादाला लागू नका, नाहीतर मी तुम्हाला नागडं करल्याशिवाय सोडणार नाही, असे वक्तव्य राऊत यांनी केले होते. यासंदर्भात शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली.

संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर एकेरी आणि शेलक्या भाषेत टीका केल्याबद्दल शरद पवार यांना विचारण्यात आले. त्यावर शरद पवार म्हणाले की, सत्तेत असलेल्यांनी जमिनीवर पाय ठेऊन वागायचे असते. पण सत्ताधारी नेते इतरांना तुरुंगात घालण्याची आणि जामीन रद्द करु, अशी वक्तव्यं करत आहेत. हे काही राजकीय नेत्यांचे काम नव्हे. काही लोकांनी टोकाला जाण्याची भूमिका घेतली असेल तर ठीक आहे, असे शरद पवार यांनी म्हटले.
…तर उद्धव आणि रश्मी ठाकरे हे संजय राऊतांना चप्पलेने मारतील; नारायण राणेंचा खळबळजनक दावा
शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारीत पडणार असल्याच्या संजय राऊत यांच्या दाव्याविषयीही शरद पवार यांना विचारणा करण्यात आली. त्यावर संजय राऊत यांनी म्हटले की, फेब्रुवारीत शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार आहे, याबाबत मला काही माहिती नाही. आता मी मुंबईला गेल्यावर संजय राऊत यांच्याशी बोलेल आणि जाणून घेईन. सरकार पाडण्यासाठी संजय राऊत यांनी काही नियोजन केले आहे का, याबाबत मला माहिती नाही, अशी मिश्कील टिप्पणी शरद पवार यांनी केली.

कट्टर शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठिशीच: शरद पवार

गेल्या काही दिवसांमध्ये मी महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमद्ये गेलो आहे. शिवसेना पक्षात दोन गट पडलेत, ही खरी बाब आहे. पण बहुसंख्य कट्टर शिवसैनिक हे उद्धव ठाकरे यांच्याच बाजूने आहेत, असा दावा शरद पवार यांनी केला. काही आमदार आणि खासदार उद्धव ठाकरे यांची साथ सोडून गेले आहेत. पण निवडणुका लागतील तेव्हा जनतेच्या मनातील खऱ्या भावना लक्षात येतील, असे शरद पवार यांनी म्हटले.
राणेंनी माझ्या नादाला लागू नये, मी तुमची आर्थिक प्रकरणं बाहेर काढली तर ५० वर्षे तुरुंगात खितपत पडाल: राऊत

संभाजी महाराजांना स्वराज्यक्षक म्हणण्यात काहीच चूक नाही: शरद पवार

छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर स्वराज्यावर इतके झाले. पण या सर्व हल्ल्यांना छत्रपती संभाजी महाराजांनी समर्थपणे तोंड दिले. त्यामुळे संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षक म्हणणे चुकीचे नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Source link

Maharashtra politicsncpSanjay RautSharad Pawarsharad pawar press conference in kolhapurShinde-Fadnavis govtशरद पवारसंजय राऊत
Comments (0)
Add Comment