मॉलमध्ये खरेदी करुन परतताना घात, एक चूक आणि बाईकस्वार जीवलग मित्रांचा जीव गेला

औरंगाबाद : औरंगाबादेतील मॉलमध्ये खरेदी करून जालन्याला निघालेल्या दोन जिवलग मित्रांचा करुण अंत झाला. मित्र प्रवास करत असलेल्या दुचाकीला भरधाव ट्रकने चिरडले. या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री लाडगाव – करमाड जवळ घडली. अपघातग्रस्त भागातील पथदिवे बंद असल्याने गेल्या काही काळापासून लहान मोठे अपघात होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. हीच चूक बाईकस्वार मित्रांच्या जीवावर बेतल्याचे दिसते.

विलास मनोहर पाचीपांडव (वय २८ वर्ष) आणि प्रवीण प्रल्हाद सुरसे (वय २७ वर्ष, दोघे रा. जालना) अशी दोघा मृत तरुणांची नावे आहेत.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, विलास आणि प्रवीण दोघेही (एम.एच.२१ बिएक्स ५९९३) या दुचाकीने जालन्याहून खरेदीसाठी औरंगाबादेतील मॉलमध्ये आले होते. मॉलमध्ये खरेदी करून रात्री ते जालनाकडे परत घरी जात होते.

ओरिकसिटीच्या लाडगाव-करमाड शिवेवर असलेल्या प्रवेशद्वारातून जालना महामार्गावरून आलेल्या ट्रकने अचानक वळण घेतले. त्यामुळे दुचाकीस्वाराचे बाईकवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी ट्रकच्या मधोमध घुसली. या भीषण अपघातात दोघेही रक्तबंबाळ अवस्थेत ट्रकखाली फसले होते.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत दोघानाही बाहेर काढले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले.

हेही वाचा : मी दारू विकणार नाही; विक्रेत्याला महिलांकडून बेदम चोप; साताऱ्यातील चिलेवाडीच्या महिलांचं रौद्ररूप

जिवलग मित्रांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून जेथे अपघात झाला त्या भागातील पथदिवे बंद असल्याने गेल्या काही काळापासून या भागात लहान मोठे अपघात होत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

हेही वाचा : साताऱ्यात २० वर्षीय तरूणाचा मृतदेह आढळला, प्रेम प्रकरणातून हत्येचा संशय; शहरात खळबळ

Source link

aurangabad best friends accidentaurangabad bike accidentaurangabad truck hit bikebike accidentmaharashtra accident news todayऔरंगाबाद अपघातऔरंगाबाद मित्र दुचाकी अपघातजीवलग मित्र मृत्यूबाईक अपघातबाईक अपघात तरुण मृत्यू
Comments (0)
Add Comment