
Tej Police Times
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, विलास आणि प्रवीण दोघेही (एम.एच.२१ बिएक्स ५९९३) या दुचाकीने जालन्याहून खरेदीसाठी औरंगाबादेतील मॉलमध्ये आले होते. मॉलमध्ये खरेदी करून रात्री ते जालनाकडे परत घरी जात होते.
ओरिकसिटीच्या लाडगाव-करमाड शिवेवर असलेल्या प्रवेशद्वारातून जालना महामार्गावरून आलेल्या ट्रकने अचानक वळण घेतले. त्यामुळे दुचाकीस्वाराचे बाईकवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी ट्रकच्या मधोमध घुसली. या भीषण अपघातात दोघेही रक्तबंबाळ अवस्थेत ट्रकखाली फसले होते.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत दोघानाही बाहेर काढले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले.
हेही वाचा : मी दारू विकणार नाही; विक्रेत्याला महिलांकडून बेदम चोप; साताऱ्यातील चिलेवाडीच्या महिलांचं रौद्ररूप
जिवलग मित्रांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून जेथे अपघात झाला त्या भागातील पथदिवे बंद असल्याने गेल्या काही काळापासून या भागात लहान मोठे अपघात होत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
हेही वाचा : साताऱ्यात २० वर्षीय तरूणाचा मृतदेह आढळला, प्रेम प्रकरणातून हत्येचा संशय; शहरात खळबळ
Recover your password.
A password will be e-mailed to you.