नाना पटोले आज पुण्यामध्ये पत्रकारांशी ते बोलत होते. पत्रकारांनी त्यांना राज्यपालांच्या पायउतार होण्याबाबत विचारला असता ते म्हणाले, येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मविआला महाराष्ट्रात ३८ जागांवर यश मिळेल, असा अंदाज सर्व्हेमध्ये दिसून येत आहे. ही स्थिती दिसण्यामागे भगतसिंह कोश्यारी यांचा मोठा वाटा आहे. हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी राज्यपालांना पायउतार केलं, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
आता जो सर्व्हे आलेला आहे त्यामध्ये महाविकास आघाडीचे ३८ खासदार निवडून येतील असं सांगण्यात आलेलं आहे. हे जे चित्र दिसत आहे त्यामध्ये मोठा वाटा राज्यपालांचा आहे, हे लक्षात आल्यानंतर भाजपने आणि नरेंद्र मोदींनी विचार करत त्यांची पंतप्रधानची खूर्ची कायम राहावी म्हणून हा निर्णय घेतला आहे. देशात भाजपची पुन्हा सत्ता यावी म्हणून हा केलेला एक प्रयत्न आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.
महाराष्ट्राची बदनामी जेवढी राज्यपालांकडून करून घ्याची होती ती भाजपने करून घेतली आहे. त्यांना दिलेलं काम झाल्यानं राज्यपालाला पदावरून हटवलं. राज्यपालांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा जोतिबा फुले यांच्या बाबत टिंगल ज्या प्रकारे त्यांनी केली. ती गोष्ट राज्याची जनता कधी विसरणार नाही, असं राज्यपाल म्हणाले. महाराष्ट्रात असा बायस राज्यपाल महाराष्ट्रची बदनामी करण्यासाठी बसवून ठेवला होता, असं नाना पटोले म्हणाले.
राज्यपालांचा राजीनामा मंजूर पण अद्याप माफी मागितली नाही, सुषमा अंधारेंचा घणाघात